शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 16:57 IST

दिल्लीत पत्नीने दीराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याला अपघात दाखवण्याचा प्रयत्न केला.

Delhi Crime:दिल्लीतील द्वारका परिसरात विजेचा धक्का बसून एका व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रकरणाला नवे वळण लागणं आहे. पोलिसांनी मृताची पत्नी आणि त्याच्या चुलत भावाला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला. दोघांनीही झोपेच्या गोळ्या देऊन महिलेच्या पतीला वीजेचा धक्का देऊन मारण्याचा कट रचला होता. इन्स्टाग्राम चॅटवरुन ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पतीचा झोपेच्या गोळ्यांनीही मृत्यू न झाल्याने तिने आरोपीसोबत चॅटिंग केली होती.

करण देव याच्या हत्येला विजेचा धक्का बसल्याचे सांगून पत्नी सुष्मिता देवेने त्याला रुग्णालयात नेले होते. डॉक्टरांनी करणला तपासून मृत घोषित केले. सुरुवातीला, पोलीस या प्रकरणात शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत होते. मात्र त्याआधी करणच्या भावाने संशय व्यक्त केल्यानंतर आणि काही महत्त्वाचे पुरावे दिल्यानंतर हादरवणारा प्रकार समोर आला. सुष्मिताच्या फोनवरील इन्स्टाग्राम चॅटवरून पोलिसांना हत्येच्या कटाची माहिती मिळाली. 

मृत करण देव हा उत्तम नगरमधील ओम विहार परिसरात त्याच्या कुटुंबासह राहत होता. १३ जुलै रोजी त्याच्या कुटुंबाने त्याला माता रूपराणी मगो रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने पोलिसांना वीजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. करणच्या भावाने सुष्मिता आणि चुलत भावावर संशय व्यक्त केला, त्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुष्मिताने करणचे शवविच्छेदन करु नये अशी विनंती केली होती. मात्र पोलिसांनी शवविच्छेदन करुन अहवाल मागवला.

अहवालानुसार करणला झोपेच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्याच्या रक्तात जास्त प्रमाणात ड्रग्ज आढळून आले, ज्यामुळे मृत्यूचे कारण संशयास्पद वाटू लागले. अहवालानंतर पोलिसांचा संशय अधिकच वाढला आणि प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले. इन्स्टाग्राम चॅटच्या आधारे पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. करणच्या भावाने आरोपी राहुलचा मोबाईल कामासाठी घेतला होता. त्यावेळी त्याने राहुचले सुष्मिता सोबतची चॅटिंग वाचली आणि त्याला धक्का बसला.

चॅटिंगमध्ये काय सापडलं?

१२ जुलैच्या रात्री सुष्मिताने करणच्या जेवणात १५ झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. जेव्हा गोळ्यांचा लगेच परिणाम झाला नाही तेव्हा सुष्मिता घाबरली आणि तिने राहुलला मेसेज करायला सुरुवात केली. "गोळ्या घेतल्यानंतर किती वेळात मरतो हे एकदा पाहून घे. त्याला जेवल्यापासून तीन तास झाले आहेत. त्याला उलट्या झाल्या नाहीत, शौचाला झाली नाही, काहीही झालेली नाही. अजून त्याचा श्वास सुरु आहे, काय करायचं असा मेसेज सुष्मिताने केला. त्यावर राहुलने तुला काही कळत नसेल तर त्याला विजेचा धक्का दे असं सांगितले. यानंतर सुष्मिताने त्याला शॉक बांधून कसा देऊ असं विचारलं. राहुलने करणला टेपने बांधायला सांगितले. त्यानंतर सुष्मिताने तो खूप हळू श्वास घेतोय असं सांगितले. यावर राहुलने तुझ्याकडे असलेल्या सर्व गोळ्या त्याला देऊन टाक असं म्हटलं. सुष्मिताने सांगितले की, 'मी त्याचे तोंड उघडू शकत नाही. मी घशात फक्त पाणी ओतू शकते,  तू इथे ये, आपण एकत्र मिळून ते त्याला खायला देऊ शकतो, असं म्हटलं.

दरम्यान, कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, सुष्मिता आणि राहुल यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनीही करणची हत्या केली जेणेकरून ते एकत्र राहू शकतील आणि करणची मालमत्ता ताब्यात घेऊ शकतील. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिस