शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

जन्मठेप की फाशी, तिहेरी हत्याकांडाचा आज निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 01:39 IST

पिठाच्या गोण्या चोरण्यासाठी केली होती हत्या, ठाणे न्यायालयाने ठरवले तिन्ही आरोपींना दोषी

ठाणे : पिठाच्या गोण्या चोरण्याच्या उद्देशाने आठ वर्षांपूर्वी ट्रकचालक आणि क्लीनरसह तिघांची हत्या करून एक क्लीनरला गंभीर जखमी करणारा ट्रकचालक अनिस नबी खाँ, सकुर अब्दुल रहेमान खाँ आणि अजितकुमार मिश्रा या तिघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एम. पटवर्धन यांनी बुधवारी दोषी ठरवले.नोव्हेंबर २०१२ मध्ये ट्रकचालक राजेश यादव याचा मृतदेह भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापडला होता. त्याचदरम्यान कोनगाव परिसरात छोटू ऊर्फ श्रीकांत यादव हा जखमी अवस्थेत सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून अनिस, सकुर आणि अजितकुमार मिश्रा या तिघांना अटक केली. या प्रकरणातील चौथा आरोपी जब्बार खान हा अद्यापही फरार आहे. आरोपींना पकडल्यानंतर त्यांनी केवळ राजेशचीच नव्हे तर, ट्रकचालक हरिसिंग बलराम आणि क्लीनर नितीन बलराम यांचीही हत्या करून त्यांचे मृतदेह कसारा घाटात फेकल्याचे समोर आले.अनिस आणि ट्रकचालक हरिसिंग हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. ते वेगवेगळ्या ट्रकमध्ये पिठाच्या गोण्या भरून २६ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, अनिसने हरिसिंग याच्या ट्रकमधील गोण्या चोरण्याच्या उद्देशाने तिघा मित्रांच्या मदतीने हरिसिंग व नितीन यांना जेवणात गुंगीचे औषध देऊन त्यांची गळा आवळून हत्या केली. २७ नोव्हेंबरला मालेगाव येथे राजेश यादव हा ट्रक घेऊन त्याच्यामागे येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी राजेशला चहा पिण्यासाठी थांबवले. चहा पिऊन झाल्यावर अनिसने राजेश आणि छोटूला जेवण्याचा आग्रह करत नाशिकला एका ढाब्यावर थांबवले. त्यावेळी राजेशला ट्रकमध्ये हरिसिंग आणि नितीनचे मृतदेह दिसले. त्यावरून संशय आल्याने राजेशने अनिसला विचारणा केली. आपले बिंग फुटेल, या भीतीने अनिसने राजेश आणि छोटूलाही जेवण आणि चहातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर, संधी साधून त्यांनी राजेशला ठार मारत, पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गादीत गुंडाळून टाकून दिला. छोटू हादेखील ठार झाल्याचे समजून आरोपींनी त्यालाही फेकले. त्यानंतर चौघांनी ३१ हजार ५०० किलोच्या पिठाच्या ६३१ गोण्या चोरून नेल्या.आरोपींचे वकील हजर नसल्याने न्यायालयाने निकाल ठेवला राखूनजन्मठेप की फाशीची शिक्षा द्यावी, याबाबत न्यायालयाने आरोपींना विचारणा केली. मात्र, आपण गुन्हा केलाच नसल्याच्या युक्तिवादावर आरोपी ठाम राहिले. सरकारी वकील वर्षा चंदने यांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली. या सुनावणीवेळी तीन आरोपींपैकी दोघांचे वकील अनुपस्थित होते.आरोपींचे वकील हजर नसल्याने शिक्षेचा निकाल न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल गुरुवारसाठी राखून ठेवला आहे. हे हत्याकांड आठ वर्षांपूर्वी घडले होते. या खटल्यात सरकारी पक्षाने २६ साक्षीदार तपासले. त्यांनी सादर केलेले पुरावे, युक्तिवाद ग्राह्यमानून न्यायालयाने तिघांना दोषी ठरवले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय