शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

महात्मा गांधी जयंतीदिनी होणार सुटका; कारागृहातून शिक्षा माफीसाठी सात कैद्यांचे प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 18:55 IST

सर्व सामान्य बंदीजनांना मिळणार न्याय

ठळक मुद्दे२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० या दरम्यान महात्मा गांधी यांची १५० वी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. ७० टक्के अपंग असलेल्या कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळेल, अशी नियमावली आहे. सात कैद्यांपैकी किती जणांना माफी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

अमरावती - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून गृह विभागाच्याावतीने कैद्यांच्या शिक्षेत माफी देत त्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने येथील मध्यवर्ती कारागृहाने यंदा शासनाकडे सात सर्वसामान्य कैद्यांच्या माफीसाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे किती कैद्यांना माफी मिळते.  हे २ ऑक्टोबररोजी स्पष्ट होणार आहे.२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०२० या दरम्यान महात्मा गांधी यांची १५० वी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. सत्य, अहिंसा ही महात्मा गांधी यांची शिकवणूक आहे. त्यानुसार शासनाने कारागृहात बंदिस्त असलेल्या सामान्य कैद्यांसाठी शिक्षेत माफी ही विशेष योजना राबवित आहे. गृह विभागाने कैद्यांच्या शिक्षेत माफी देण्याबाबत अटी, शर्थीदेखील लादल्या आहेत. टाडा, खून, दहशतवादी, पोस्को, देशविघातक कारवाया, बलात्कार, अंमली पदार्थ तस्करी गुन्ह्यातील कैद्यांना ही सवलत मिळणार नाही, असे शासनाने अगोदरच स्पष्ट केले आहे. केवळ सर्वसामान्य कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळणार आहे. यात महिला कैदी ५५ वर्षांवरील, तर पुरूष कैदी ६० वर्षांवरील असणे नियमावली आहे. शिक्षेदरम्यान या कैद्यांची वागणूक सौजन्याची असणे आवश्यक करण्यात आली आहे. तसेच, ७० टक्के अपंग असलेल्या कैद्यांना शिक्षा माफीचा लाभ मिळेल, अशी नियमावली आहे. सात कैद्यांपैकी किती जणांना माफी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PrisonतुरुंगjailतुरुंगMahatma Gandhiमहात्मा गांधीAmravatiअमरावती