शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 16:48 IST

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले.

ठळक मुद्देदोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे

फिरोजाबाद – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे आईसोबत वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या दोन मुलींनी एका क्रूर घटना केली आहे. आईच्या डोक्यात हल्ला करून दोन्ही मुलींनी एकाच साडीला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी पोहचले. तेव्हा घराचा दरवाजा तोडून हे मृतदेह बाहेर काढले. एकाच कुटुंबातील ३ मृतदेह पाहून गावात खळबळ माजली आहे.

नारखी धौंकल येथील रहिवासी विमला देवी उर्फ विमलेश दोन मुली एक २४ वर्षीय ममता आणि दुसरी २० वर्षीय रेणूसोबत एकाच घरात राहत होती.तर पती वेदराम हा रजावली पोलीस चौकी परिसरात एका रुममध्ये राहत होता. तो मजुरी करून स्वत:चं पोट भरत होता. त्यांची तिन्ही मुलं वेगवेगळी राहत होती. शनिवारी रात्री गावातील एका घरातून खूप दुर्गंध येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली.

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. एकीकडे जमिनीवर आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर दुसरीकडे दोन्ही मुलींचा मृतदेह एका साडीच्या साहय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या मृतदेहातून दुर्गंध येत होता. आईच्या डोक्यात जबर मारहाण झाली होती. तिच्या मृतदेहाशेजारी सगळीकडे रक्त सांडले होते.

गावात राहणाऱ्या मृत आईचा मुलगा शैतान सिंहने सांगितले की, त्यांच्या दोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. मोठ्या बहिणीला बीएससीनंतर बीटीसी करायचं होतं तर छोटी बहिणी बीए पास झाली होती. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.

४ दिवसांपासून मृतदेह घरातच

पोलिसांच्या माहितीनुसार, जवळपास ४ दिवसांपासून हे मृतदेह घरातच असल्याचं दिसून येते. आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे. एसएसपीच्या म्हणण्याप्रमाणे मुलींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तर आईचा मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला. त्यामुळे प्रथमदर्शनी आईची हत्या करून मुलींनी स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही पोलिसांचा तपास सुरू आहे.   

टॅग्स :Policeपोलिस