शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 16:48 IST

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले.

ठळक मुद्देदोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे

फिरोजाबाद – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे आईसोबत वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या दोन मुलींनी एका क्रूर घटना केली आहे. आईच्या डोक्यात हल्ला करून दोन्ही मुलींनी एकाच साडीला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी पोहचले. तेव्हा घराचा दरवाजा तोडून हे मृतदेह बाहेर काढले. एकाच कुटुंबातील ३ मृतदेह पाहून गावात खळबळ माजली आहे.

नारखी धौंकल येथील रहिवासी विमला देवी उर्फ विमलेश दोन मुली एक २४ वर्षीय ममता आणि दुसरी २० वर्षीय रेणूसोबत एकाच घरात राहत होती.तर पती वेदराम हा रजावली पोलीस चौकी परिसरात एका रुममध्ये राहत होता. तो मजुरी करून स्वत:चं पोट भरत होता. त्यांची तिन्ही मुलं वेगवेगळी राहत होती. शनिवारी रात्री गावातील एका घरातून खूप दुर्गंध येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली.

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. एकीकडे जमिनीवर आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर दुसरीकडे दोन्ही मुलींचा मृतदेह एका साडीच्या साहय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या मृतदेहातून दुर्गंध येत होता. आईच्या डोक्यात जबर मारहाण झाली होती. तिच्या मृतदेहाशेजारी सगळीकडे रक्त सांडले होते.

गावात राहणाऱ्या मृत आईचा मुलगा शैतान सिंहने सांगितले की, त्यांच्या दोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. मोठ्या बहिणीला बीएससीनंतर बीटीसी करायचं होतं तर छोटी बहिणी बीए पास झाली होती. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.

४ दिवसांपासून मृतदेह घरातच

पोलिसांच्या माहितीनुसार, जवळपास ४ दिवसांपासून हे मृतदेह घरातच असल्याचं दिसून येते. आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे. एसएसपीच्या म्हणण्याप्रमाणे मुलींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तर आईचा मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला. त्यामुळे प्रथमदर्शनी आईची हत्या करून मुलींनी स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही पोलिसांचा तपास सुरू आहे.   

टॅग्स :Policeपोलिस