शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 16:48 IST

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले.

ठळक मुद्देदोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे

फिरोजाबाद – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे आईसोबत वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या दोन मुलींनी एका क्रूर घटना केली आहे. आईच्या डोक्यात हल्ला करून दोन्ही मुलींनी एकाच साडीला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी पोहचले. तेव्हा घराचा दरवाजा तोडून हे मृतदेह बाहेर काढले. एकाच कुटुंबातील ३ मृतदेह पाहून गावात खळबळ माजली आहे.

नारखी धौंकल येथील रहिवासी विमला देवी उर्फ विमलेश दोन मुली एक २४ वर्षीय ममता आणि दुसरी २० वर्षीय रेणूसोबत एकाच घरात राहत होती.तर पती वेदराम हा रजावली पोलीस चौकी परिसरात एका रुममध्ये राहत होता. तो मजुरी करून स्वत:चं पोट भरत होता. त्यांची तिन्ही मुलं वेगवेगळी राहत होती. शनिवारी रात्री गावातील एका घरातून खूप दुर्गंध येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली.

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. एकीकडे जमिनीवर आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर दुसरीकडे दोन्ही मुलींचा मृतदेह एका साडीच्या साहय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या मृतदेहातून दुर्गंध येत होता. आईच्या डोक्यात जबर मारहाण झाली होती. तिच्या मृतदेहाशेजारी सगळीकडे रक्त सांडले होते.

गावात राहणाऱ्या मृत आईचा मुलगा शैतान सिंहने सांगितले की, त्यांच्या दोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. मोठ्या बहिणीला बीएससीनंतर बीटीसी करायचं होतं तर छोटी बहिणी बीए पास झाली होती. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.

४ दिवसांपासून मृतदेह घरातच

पोलिसांच्या माहितीनुसार, जवळपास ४ दिवसांपासून हे मृतदेह घरातच असल्याचं दिसून येते. आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे. एसएसपीच्या म्हणण्याप्रमाणे मुलींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तर आईचा मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला. त्यामुळे प्रथमदर्शनी आईची हत्या करून मुलींनी स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही पोलिसांचा तपास सुरू आहे.   

टॅग्स :Policeपोलिस