शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

धक्कादायक! आईची हत्या करून दोन मुलींनी घेतला गळफास; मृतदेह ४ दिवस घरातच पडून होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 16:48 IST

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले.

ठळक मुद्देदोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे

फिरोजाबाद – उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे आईसोबत वेगवेगळ्या घरात राहणाऱ्या दोन मुलींनी एका क्रूर घटना केली आहे. आईच्या डोक्यात हल्ला करून दोन्ही मुलींनी एकाच साडीला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी पोहचले. तेव्हा घराचा दरवाजा तोडून हे मृतदेह बाहेर काढले. एकाच कुटुंबातील ३ मृतदेह पाहून गावात खळबळ माजली आहे.

नारखी धौंकल येथील रहिवासी विमला देवी उर्फ विमलेश दोन मुली एक २४ वर्षीय ममता आणि दुसरी २० वर्षीय रेणूसोबत एकाच घरात राहत होती.तर पती वेदराम हा रजावली पोलीस चौकी परिसरात एका रुममध्ये राहत होता. तो मजुरी करून स्वत:चं पोट भरत होता. त्यांची तिन्ही मुलं वेगवेगळी राहत होती. शनिवारी रात्री गावातील एका घरातून खूप दुर्गंध येऊ लागल्यानंतर स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती कळवली.

घटनास्थळी पोहचलेले पोलीस अधिकारी अभिषेक श्रीवास्तव, केके तिवारी यांनी जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा आतमधील दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. एकीकडे जमिनीवर आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर दुसरीकडे दोन्ही मुलींचा मृतदेह एका साडीच्या साहय्याने लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. या मृतदेहातून दुर्गंध येत होता. आईच्या डोक्यात जबर मारहाण झाली होती. तिच्या मृतदेहाशेजारी सगळीकडे रक्त सांडले होते.

गावात राहणाऱ्या मृत आईचा मुलगा शैतान सिंहने सांगितले की, त्यांच्या दोन्ही बहिणीचं लग्न झालं नव्हतं. लग्नाचा विषय काढला की त्या दोघीही आधी करिअर करायचं आणि नंतर लग्न असं म्हणत होत्या. मोठ्या बहिणीला बीएससीनंतर बीटीसी करायचं होतं तर छोटी बहिणी बीए पास झाली होती. आई आणि बहिणीच्या मध्ये वारंवार वाद सुरू होते अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकारी अशोक कुमार यांना घटनास्थळी मिळाली.

४ दिवसांपासून मृतदेह घरातच

पोलिसांच्या माहितीनुसार, जवळपास ४ दिवसांपासून हे मृतदेह घरातच असल्याचं दिसून येते. आई आणि मुली इतर कोणाचीही काही संबंध ठेवत नव्हते. त्यामुळे त्यांच्या घरी गावातील कोणीही येत जात नसायचे. एसएसपीच्या म्हणण्याप्रमाणे मुलींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला तर आईचा मृतदेह जमिनीवर पडलेला सापडला. त्यामुळे प्रथमदर्शनी आईची हत्या करून मुलींनी स्वत: आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र तरीही पोलिसांचा तपास सुरू आहे.   

टॅग्स :Policeपोलिस