शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्रींच्या कारनं अपघाताच्या ५ सेकंदपूर्वी...; Mercedes कंपनीचा अंतरिम रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 11:19 IST

१२ सप्टेंबर रोजी मर्सिडीज बेंजच्या तज्ज्ञाचं पथक हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे.

मुंबई - टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री(Cyrus Mistry) यांच्या अपघाताबाबत लग्झरी कार कंपनी मर्सिडीज बेंजनं त्यांचा अंतरिम रिपोर्ट पालघर पोलिसांना सोपवला आहे. रस्त्यावरील दुभाजकाला धडक देण्याच्या ५ सेंकदआधी कारचा ब्रेक दाबण्यात आला होता असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कारचं निरीक्षण करण्यासाठी मर्सिडीज बेंज कंपनीचे तज्ज्ञ सोमवारी हाँगकाँगवरून मुंबईला येतील. 

पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, मर्सिडीज बेंजने त्यांचा अंतरिम रिपोर्ट पोलिसांना सोपवला आहे. अपघातापूर्वी कारचा वेग १०० किमी प्रतितास इतका होता. जेव्हा पुलावरील दुभाजकाला कार आदळली तेव्हा कारचा वेग ८९ किमी प्रतितास होता. रिपोर्टनुसार अपघाताच्या ५ सेकंदआधी कारचा ब्रेक दाबण्यात आला होता. स्थानिक आरटीओनंही रिपोर्ट सोपवला. त्यात दुर्घटनेत कारमधील ४ एअर बॅग्ज उघडल्या होत्या. त्यातील ३ चालकाच्या बाजूने तर एक बाजूच्या सीटवर होती असं त्यांनी सांगितले. 

१२ सप्टेंबर रोजी मर्सिडीज बेंजच्या तज्ज्ञाचं पथक हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे. त्यावेळी कार हिरानंदानी यांच्या मर्सिडिज शोरुममध्ये ठेवण्यात येईल. निरीक्षणानंतर कंपनी त्यांचा अंतिम रिपोर्ट सादर करेल असं पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. 

चौकशीचे आदेशया घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी तसेच कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. महामार्गावर सूर्या ब्रीजजवळ झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघा जखमींना गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही गाडी महिला चालवत होती. चालक महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. या अपघाताबाबत अधिक तपास कासा पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी सचिन नावाडकर यांनी दिली.कसा होता प्रवास?सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री यांचे सुपुत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमधघून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंपीरिअल कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले. त्यानतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता. 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्री