शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Cyrus Mistry Accident: सायरस मिस्त्रींच्या कारनं अपघाताच्या ५ सेकंदपूर्वी...; Mercedes कंपनीचा अंतरिम रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2022 11:19 IST

१२ सप्टेंबर रोजी मर्सिडीज बेंजच्या तज्ज्ञाचं पथक हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे.

मुंबई - टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री(Cyrus Mistry) यांच्या अपघाताबाबत लग्झरी कार कंपनी मर्सिडीज बेंजनं त्यांचा अंतरिम रिपोर्ट पालघर पोलिसांना सोपवला आहे. रस्त्यावरील दुभाजकाला धडक देण्याच्या ५ सेंकदआधी कारचा ब्रेक दाबण्यात आला होता असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कारचं निरीक्षण करण्यासाठी मर्सिडीज बेंज कंपनीचे तज्ज्ञ सोमवारी हाँगकाँगवरून मुंबईला येतील. 

पालघर पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले की, मर्सिडीज बेंजने त्यांचा अंतरिम रिपोर्ट पोलिसांना सोपवला आहे. अपघातापूर्वी कारचा वेग १०० किमी प्रतितास इतका होता. जेव्हा पुलावरील दुभाजकाला कार आदळली तेव्हा कारचा वेग ८९ किमी प्रतितास होता. रिपोर्टनुसार अपघाताच्या ५ सेकंदआधी कारचा ब्रेक दाबण्यात आला होता. स्थानिक आरटीओनंही रिपोर्ट सोपवला. त्यात दुर्घटनेत कारमधील ४ एअर बॅग्ज उघडल्या होत्या. त्यातील ३ चालकाच्या बाजूने तर एक बाजूच्या सीटवर होती असं त्यांनी सांगितले. 

१२ सप्टेंबर रोजी मर्सिडीज बेंजच्या तज्ज्ञाचं पथक हाँगकाँगवरून मुंबईला येणार आहे. त्यावेळी कार हिरानंदानी यांच्या मर्सिडिज शोरुममध्ये ठेवण्यात येईल. निरीक्षणानंतर कंपनी त्यांचा अंतिम रिपोर्ट सादर करेल असं पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे. 

चौकशीचे आदेशया घटनेची माहिती मिळताच पालघरचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी तसेच कासा उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. महामार्गावर सूर्या ब्रीजजवळ झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघा जखमींना गुजरातमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही गाडी महिला चालवत होती. चालक महिलेचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी माहिती पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहेत. या अपघाताबाबत अधिक तपास कासा पोलीस करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधिकारी सचिन नावाडकर यांनी दिली.कसा होता प्रवास?सायरस मिस्त्री हे पालोनजी मिस्त्री यांचे सुपुत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमधघून त्यांनी आपलं शिक्षण घेतलं. त्यानंतर इंपीरिअल कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. २००६ मध्ये सायरस मिस्त्री हे टाटा समूहाचे सदस्य बनले. त्यानतर २०१३ मध्ये त्यांच्याकडे टाटा समुहाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. परंतु २०१६ मध्ये झालेल्या वादानंतर त्यांना या पदावरून हटवण्यात आलं. याशिवाय सायरस मिस्त्री हे शापूरजी पालोनजी समुहाचे मॅनेजिंग डायरेक्टरही होती. सायरस मिस्त्री यांचे आजोबा शापूरजी मिस्त्री यांनी दोराबजी टाटा यांच्याकडून टाटा समूहातील १८.५ टक्के हिस्सा विकत घेतला होता. 

टॅग्स :Cyrus Mistryसायरस मिस्त्री