शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

तीन शिधावाटप दुकानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 17:28 IST

अन्नधान्यापासून एकही पात्र शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही याबाबतच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत.

ठाणे : शिधापत्रिकाधारकांना शिधाजिन्नसाचा पुरवठा सुरळीत राहण्याकरीता उप नियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ यांचे नियंत्रणाखाली १३ दक्षता पथक गठीत करण्यात आलेली असून, सदर पथकामार्फत शिधापत्रिकांच्या शिधावाटप कोणाविरुध्द प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दुकानाच्या तपासण्या घेण्यात येत आहेत. तपासणीत आढळून आलेल्या गंभीर दोषांच्या अनुषंगाने तीन अधिकृत शिधावाटप दुकानाच्या प्राधिकारपत्रधारका विरुध्द जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले आहे.

अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक ४१-फ-२८७ (वाशी) या दुकानाच्या प्राधिकारपत्रधारक श्री.श्याम बाजीराव जाधव यांनी शिधापत्रिकाधारकांना शासन निर्धारित परिमाणानुसार शिधाजिन्नस न दिल्याचे तपासणी व गृहभेटीत आढळून आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र दिनांक ०२ जुलै २०२० रोजीच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले आहे.

 अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक ३६-फ-१८१ (ठाणे) या दुकानाच्या प्राधिकारपत्रधारक श्री. चेतन कल्याणजी सावला यांनी यांनी शासनाने विहीत केलेल्या वेळेत दुकान उघडे ठेवत नसल्यामूळे व दुकानात मोफत तांदूळाचा साठा उपलब्ध नाही अशी चूकीची माहीती देऊन शिधापत्रिकाधारकांना शिधा जिन्नसा पासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र दिनांक ०२ जुलै २०२० रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.

अधिकृत शिधावाटप दुकान क्रमांक ३६-फ-२१२ (ठाणे) या दुकानाच्या प्राधिकारपत्रधारक श्रीम. डायबेन अंबाजी पटेल यांनी शिधापत्रिकाधारकांना शासन निर्धारित परिमाणानुसार शिधाजिन्नस वितरीत केले नसल्याचे दुकानाच्या तपासणीत आढळून आल्याने दुकानाचे प्राधिकारपत्र दिनांक ०२ जुलै २०२० रोजीच्या आदेशान्वये रद्द करण्यात आले. दिनांक २४ मार्च २०२० रोजी पासून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी पासून ते आज पर्यंत तीन दुकानांच्या प्राधिकारपत्रधारकांविरुध्द फौजदारी गुन्हे नोंद करुन दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित करण्यात आले. तर १३ दुकानांचे प्राधिकारपत्र निलंबित तर ७ दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्यात आलेले आहेत.

दिनांक ०२ जुलै २०२० पासून प्राधान्य कुंटूब गटातील लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना माहे जुलै महिना नियमित अन्नधान्याचे वितरण करण्यात येत असून, माहे जून मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभा पासून वंचीत राहीलेल्या लाभार्थ्याना १० जूलै २०२० पर्यंत मोफत तांदूळ वितरीत करण्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

 आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत विस्थापित मजूर/ रोजंदारीवर काम करणारे मजूर व विनाशिधापत्रिकाधारक अश्या ५२७४० व्यक्तींना आतापर्यंत ४९९९.२०  क्विंटल  मोफत तांदूळाचे वितरण करण्यात आलेले आहे. या योजने अंतर्गत शिल्लक राहीलेल्या लाभार्थ्यांना देखील माहे मे व जून २०२० च्या वितरणास दिनांक १० जूलै,२०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

अन्नधान्यापासून एकही पात्र शिधापत्रिकाधारक वंचित राहणार नाही याबाबतच्या सक्त सुचना देण्यात आलेल्या आहेत. फ परिमंडळ कार्यक्षेत्रातंर्गत येणाऱ्या सर्व शिधापत्रिकाधारकांना आवाहन करण्यात येते की, आपणास सार्वजनिक वितरण व्यवस्थेबाबत कोणत्याही अडचणी असल्यास ०२२ -२५३३२६५७ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा तसेच सर्व शिधापत्रिकाधारकांनी अधिकृत शिधावाटप दुकानातून गर्दी न करता सोशल डिस्टसिंगचे पालन करुन शिधाजिन्नस घ्यावे असे उप नियंत्रक शिधावाटप फ परिमंडळ, ठाणे श्री. नरेश वंजारी यांचेकडून आवाहन करण्यात करण्यात आले आहे.