शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भयावह आकडेवारी! देशात दर तासाला तीन बलात्कार, दिवसाला ८० हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 16:13 IST

NCRB Data of Crime in 2021 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एनसीआरबी ही केंद्र सरकारचीच एजन्सी आहे. ती १९५३ पासूनची आकडेवारी प्रसिद्ध करते, तसेच पहिल्या अहवालात या संस्थेने १९४८ चे आकडे देखील दिले होते. 

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशाने या ७५ वर्षांत विलक्षण प्रगती केली आहे. परंतू, गुन्हेगारीने देखील पार मुळापर्यंत हात पाय पसरले आहेत. १९४८ मध्ये स्वातंत्र्याच्या एक वर्षात पोलीस ठाण्यांमध्ये ६ लाखांच्या आसपास गुन्हे नोंद झाले होते. २०२१ मध्ये याच गुन्ह्यांची संख्या साठ लाखांवर गेली आहे.  स्वातंत्र्यानंतर देशातील गुन्हेगारी ही दहा टक्क्यांनी वाढली आहे. ही त्या त्या वर्षाची आकडेवारी आहे. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एनसीआरबी ही केंद्र सरकारचीच एजन्सी आहे. ती १९५३ पासूनची आकडेवारी प्रसिद्ध करते, तसेच पहिल्या अहवालात या संस्थेने १९४८ चे आकडे देखील दिले होते. 

नुकताच NCRB ने 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी देशभरात 60.96 लाख गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले. यापैकी 36.63 लाख खटले भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत नोंदवले गेले. तथापि, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सुमारे 8% कमी गुन्हे नोंद झाले होते. 2020 मध्ये 66 लाखांहून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले होते. 2021 मध्ये देशभरात 29,272 हत्येचे गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच दररोज 80 मर्डर. 2020 च्या तुलनेत हा आकडा 0.3% ने जास्त आहे. 2020 मध्ये खुनाचे 29,193 गुन्हे दाखल झाले होते. बहुतांश हत्यांमागे वाद कारणीभूत असल्याचे देखील यात म्हटले आहे. गेल्या वर्षी या वादातून 9,765 खून झाले होते. त्याच वेळी वैयक्तिक वैमनस्यातून 3,782 खून झाले आहेत.

2021 मध्ये महिलांबाबतच्या 4.28 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर बलात्काराचे ३१,६७७ गुन्हे दाखल झाले. दर तासाला तीन महिलांवर बलात्कार झाले आहेत. बलात्काराच्या प्रयत्नाचे ३,८०० गुन्हे दाखल झाले. बलात्काराच्या घटनांमध्ये 97% आरोपी हे ओळखीतलेच होते. 2,024 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यच बलात्कार करणारा होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी