शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

धक्कादायक! 'मी माझ्या मर्जीने आत्महत्या करतोय, घरच्यांना...'; तरुणाच्या सुसाईड नोटने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 18:25 IST

Crime News : एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

नवी दिल्ली - राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. बालोतरा इंडस्ट्रियल परिसरातील एका फॅक्ट्रीमध्ये तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या सात तास आधी तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. यामध्ये त्याने आपल्या मर्जीने आत्महत्या करत आहे. कृपया घरच्यांना त्रास देऊ नका असं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधासर गावाचा निवासी असलेला 20 वर्षीय विशनाराम बालोतरा इंडस्ट्रियल परिसरातील एका कपड्याच्या फॅक्ट्रीमध्ये काम करतो. तरुणाने शनिवारी फॅक्ट्रीमध्येच गळफास घेतला. आत्महत्या करण्याआधी जवळपास सात-आठ तास पहिला त्याने सोशल मीडियावर सुसाईड करत असल्याची एक पोस्ट फॉरवर्ड केली होती. ही पोस्ट कुटुंबीयांनी देखील पाहिली. त्यांनी फोन करून तरुणाला याबाबत विचारलं तेव्हा त्याने सांगितलं. पण कुटुंबीयांना ही मस्करी असल्याचं वाटलं आणि त्यांनी तरुणाकडे दुर्लक्ष केलं. 

तरुणाशी त्यानंतर काहीच संपर्क झाला नाही म्हणून कुटुंबीय फॅक्ट्रीमध्ये आले. तेव्हा त्यांना तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याचवेळी नातेवाईकांनी सोशल मीडियावर तरुणाने आत्महत्येआधी एक पोस्ट फॉरवर्ड केल्याचं सांगितलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

"मी आत्महत्या करत आहे. यामध्ये कोणाचाच दोष नाही. मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे. कृपया माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. माझ्या तीन भावांची जोडी तशीच कायम असूदे. ओके बाय" असं तरुणाने आत्महत्येआधी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. तसेच तरुणाच्या आत्महत्येने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी