शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

माता न तू वैरिणी! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली अवघ्या एका दिवसाच्या लेकीची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 19:16 IST

Crime News : मुलाच्या हव्यासापोटी दोन मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) नात्याला काळीमा फासणाऱ्या दोन घटना समोर आल्या आहेत. मुलाच्या हव्यासापोटी दोन मुलींची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना समोर आली आहे. पहिली घटना बांकुरा जिल्ह्यातील आहे, जिथे वडिलांनी मुलाच्या हव्यासापोटी आपल्या नवजात मुलीची हत्या केली. तर दुसरी घटना कोलकाता महानगरातील इक्बालपूर (Kolkata) येथील आहे, जिथे जन्मदात्या आईनेच नर्सिंग होममध्ये अवघ्या एका दिवसाच्या नवजात लेकीचं तोंड उशीने दाबून तिची हत्या केली आहे. गेल्या 24 तासांत दोन नवजात बाळांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी इक्बालपूर पोलीस ठाणे परिसरात एका आईने उशीने तोंड दाबून तिच्या एक दिवसाच्या बाळाची हत्या केली. सकाळी 6.20 वाजता मुलीचा जन्म झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, लवली सिंहला (21) इक्बालपूर लेन येथील नेताजी सुभाष नर्सिंग होम आणि डायग्नोस्टिक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. जिथे लवलीने मंगळवारी सकाळी एका मुलीला जन्म दिला. नर्सने दिलेल्या माहितीनुसार, मुलगी झाल्याचं समजताच लवली नाराज झाली. तिचा पती अजय सिंह तिच्यासोबत होता. बुधवारी सकाळी जेव्हा ती 5.30-6.00 च्या दरम्यान ड्युटीवर असलेल्या आया मुलीला बघायला गेल्या तेव्हा मुलगी मृतावस्थेत आढळली. 

मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्या आईनेच केली लेकीची हत्या 

रुग्णालयाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता तिच्या नाकावर दाबण्याच्या खुणा आहेत. मुलीच्या आईची बराच वेळ चौकशी करण्यात आली. ज्यानंतर तिने आपणच मुलीच्या चेहऱ्यावर उशी दाबून तिला मारुन टाकल्याचं कबूल आहे. तर दुसरीकडे, बांकुराच्या छटना पोलीस स्टेशन परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांना मुलगा हवा होता, पण दुसरीही मुलगी झाली. त्यामुळे वडिलांनी आपल्या 16 दिवसांच्या मुलीची हत्या केली आणि तिला शेतात नेऊन पुरलं. बुधवारी कोजागरीच्या दिवशी एका सोळा दिवसांच्या मुलीचा मृतदेह शेतात सापडला.

दुसरीही मुलगीच झाली म्हणून पिता झाला हैवान

पोलीस आणि स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनीनाथ सोरेन सलग दोन मुलींच्या जन्मामुळे आनंदी नव्हता. दरम्यान, अचानक एक मुलगी गायब झाली. मुलगी सापडली नसल्यानं आईला संशय आला. आईनं पोलिसांकडे तक्रार केली. त्या तक्रारीच्या आधारावर छटना पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर शेतात मुलीचा मृतदेह सापडला. तपासात तिच्या वडिलांनी तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह शेतात पुरल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून आरोपी अश्विनीनाथ सोरेन याला अटक करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगाल