शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Crime News: भयंकर! तीन महिलांनी रचला हत्येचा कट, पतींनाही घेतलं सोबत, त्यानंतर घडले भयानक हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 15:13 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील पिलिभीत जिल्ह्यात हत्येचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे तीन महिलांनी मिळून एका व्यक्तीच्या हत्येची योजना आखली. त्यांनी या कटामध्ये पतींनाही सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीची हत्या केली.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील पिलिभीत जिल्ह्यात हत्येचं एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथे तीन महिलांनी मिळून एका व्यक्तीच्या हत्येची योजना आखली. त्यांनी या कटामध्ये पतींनाही सोबत घेतलं. त्यानंतर त्यांनी त्या व्यक्तीची हत्या केली. पोलिसांनी जेव्हा या हत्याकांडाचा उलगडा केला. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. 

मृत कमलेश हा रेल्वेमध्ये कामाला होता. त्यांची पत्नी पूरन देवी यांनी सांगितले की, ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी कमलेश औषध आणण्यासाठी घरातून निघाला होता. तो बराच वेळ परत आला नाही, त्यामुळे त्याची पत्नी त्रस्त झाली. कमलेशचा मोबाईलही बंद होता. तिने आजूबाजूला चौकशी केली. तेव्हा एका महिलेने कमलेश हा दीनदयालसोबत दुचाकीवरून कुठेतरी गेल्याचे सांगितले. त्यानंतर तिने पोलिसांत जाऊन तक्रार दिली.

कमलेशला दीनदयालसोबत शेवटचे पाहण्यात आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर दीनदयाल याने कमलेशच्या हत्येची गोष्ट मान्य केली. त्यानंतर त्याने जी कहाणी सांगितली ती धक्कादायक होती. मृत कमलेशने दीनदयालकडून ३५ हजार रुपये उसणे घेतले होते. वर्ष झाल्यानंतरही त्याने ते परत केले नव्हते. ते पैसे परत मिळवण्यासाठी दीनदयाल आणि त्याचे दोन भाऊ दयाराम आणि हीरालाल यांनी चर्चा केली. त्यावेळी या तिघांच्याही पत्नींनी कमलेशची हत्या करण्याची कल्पना बोलून दाखवली. तसेच त्यासाठी पतींना राजी केले.  

त्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार दीनदायल कमलेशला घरी घेऊन आला. त्याच्यासाठी भोजनाची आणि मद्याची व्यवस्था केली. भोजन झाल्यानंतर त्यांनी कमलेशची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरातच पुरून टाकले. दरम्यान, मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच कमलेशचा मृतदेह आणि मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश