शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

Crime News: सुपरवायझर बॉसकडे वारंवार तक्रार करायचा, नोकरीवरून काढण्याची धमकी द्यायचा, वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 23:24 IST

Crime News: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते.

रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुपरवायझर आरोपींची वारंवार तक्रार करायचा, त्यामुळे ते वैतागले होते. त्यातूनच त्यांनी सदर तरुणाची हत्या केली. त्यानंतर ते फरार झाले होते, अखेरीस विशेष सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अटक करण्यात आली. 

दुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २२ मे रोजी जामूल ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेडा गावात एका तरुणाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. त्याच्या मनगडावर मनोज मेहर असं नाव लिहिलेलं होतं. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीमधून मृत तरुण हा गावातीलच रवी उर्फ मानसिंह टंडन आणि पुनीत धृतलहरे यांच्यासोबत दिसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस मानसिंह याच्या घरी पोहोचले असता धक्कादायक माहिती समोर आली.

रवीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ मानसिंह आणि पुनित रायपूरच्या श्याम कंपाऊंडमध्ये एकत्र काम करायचे. मनोज त्यांचा सुपरवायझर होता. शनिवारी रवीने त्याला फोन करून बोलावले. त्यानंतर रवी पुनीत, ज्ञान सिंह आणि मनोज खेरधा येथे आले. तिथे ज्ञान सिंहला घरी सोडून ते तिघे फिरायला गेले. सकाळी मनोजचा मृतदेह शेतात पडलेला आहे, तसेच रवी आणि पुनित घरी आलेले नाहीत, याची माहिती ज्ञान सिंहला मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी मृत आणि आरोपी काम करत असलेल्या कंपनीमध्ये धाव घेतली. तेथील कागदपत्रांमधून मृताचं खरं नाव हे मनोज मार्कंडेय असल्याचे समोर आले. तसेच रवी आणि पुनितसोबत त्याचा वाद होता, याची माहिती मिळाली.

दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी रवी आणि पुनितला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, मृत मनोज हा त्यांची वारंवार बॉसकडे तक्रार करायचा. तसेच शिविगाळ करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे ते वैतागले होते. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य घडवून आणले. तसेच दारूची पार्टी करण्याचे आमिष दाखवून त्याला आणले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड