शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
4
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
5
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
7
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
8
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
9
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
10
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
11
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
12
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
13
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
14
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
15
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
16
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
17
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
18
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
19
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
20
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: सुपरवायझर बॉसकडे वारंवार तक्रार करायचा, नोकरीवरून काढण्याची धमकी द्यायचा, वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 23:24 IST

Crime News: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते.

रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुपरवायझर आरोपींची वारंवार तक्रार करायचा, त्यामुळे ते वैतागले होते. त्यातूनच त्यांनी सदर तरुणाची हत्या केली. त्यानंतर ते फरार झाले होते, अखेरीस विशेष सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अटक करण्यात आली. 

दुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २२ मे रोजी जामूल ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेडा गावात एका तरुणाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. त्याच्या मनगडावर मनोज मेहर असं नाव लिहिलेलं होतं. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीमधून मृत तरुण हा गावातीलच रवी उर्फ मानसिंह टंडन आणि पुनीत धृतलहरे यांच्यासोबत दिसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस मानसिंह याच्या घरी पोहोचले असता धक्कादायक माहिती समोर आली.

रवीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ मानसिंह आणि पुनित रायपूरच्या श्याम कंपाऊंडमध्ये एकत्र काम करायचे. मनोज त्यांचा सुपरवायझर होता. शनिवारी रवीने त्याला फोन करून बोलावले. त्यानंतर रवी पुनीत, ज्ञान सिंह आणि मनोज खेरधा येथे आले. तिथे ज्ञान सिंहला घरी सोडून ते तिघे फिरायला गेले. सकाळी मनोजचा मृतदेह शेतात पडलेला आहे, तसेच रवी आणि पुनित घरी आलेले नाहीत, याची माहिती ज्ञान सिंहला मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी मृत आणि आरोपी काम करत असलेल्या कंपनीमध्ये धाव घेतली. तेथील कागदपत्रांमधून मृताचं खरं नाव हे मनोज मार्कंडेय असल्याचे समोर आले. तसेच रवी आणि पुनितसोबत त्याचा वाद होता, याची माहिती मिळाली.

दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी रवी आणि पुनितला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, मृत मनोज हा त्यांची वारंवार बॉसकडे तक्रार करायचा. तसेच शिविगाळ करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे ते वैतागले होते. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य घडवून आणले. तसेच दारूची पार्टी करण्याचे आमिष दाखवून त्याला आणले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड