शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

Crime News: सुपरवायझर बॉसकडे वारंवार तक्रार करायचा, नोकरीवरून काढण्याची धमकी द्यायचा, वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 23:24 IST

Crime News: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते.

रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत सुपरवायझर आरोपींची वारंवार तक्रार करायचा, त्यामुळे ते वैतागले होते. त्यातूनच त्यांनी सदर तरुणाची हत्या केली. त्यानंतर ते फरार झाले होते, अखेरीस विशेष सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अटक करण्यात आली. 

दुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या २२ मे रोजी जामूल ठाण्यांतर्गत येणाऱ्या खेडा गावात एका तरुणाचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत सापडला होता. त्याच्या मनगडावर मनोज मेहर असं नाव लिहिलेलं होतं. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. चौकशीमधून मृत तरुण हा गावातीलच रवी उर्फ मानसिंह टंडन आणि पुनीत धृतलहरे यांच्यासोबत दिसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस मानसिंह याच्या घरी पोहोचले असता धक्कादायक माहिती समोर आली.

रवीच्या भावाने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ मानसिंह आणि पुनित रायपूरच्या श्याम कंपाऊंडमध्ये एकत्र काम करायचे. मनोज त्यांचा सुपरवायझर होता. शनिवारी रवीने त्याला फोन करून बोलावले. त्यानंतर रवी पुनीत, ज्ञान सिंह आणि मनोज खेरधा येथे आले. तिथे ज्ञान सिंहला घरी सोडून ते तिघे फिरायला गेले. सकाळी मनोजचा मृतदेह शेतात पडलेला आहे, तसेच रवी आणि पुनित घरी आलेले नाहीत, याची माहिती ज्ञान सिंहला मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी मृत आणि आरोपी काम करत असलेल्या कंपनीमध्ये धाव घेतली. तेथील कागदपत्रांमधून मृताचं खरं नाव हे मनोज मार्कंडेय असल्याचे समोर आले. तसेच रवी आणि पुनितसोबत त्याचा वाद होता, याची माहिती मिळाली.

दरम्यान, खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी रवी आणि पुनितला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीमध्ये आरोपींनी सांगितले की, मृत मनोज हा त्यांची वारंवार बॉसकडे तक्रार करायचा. तसेच शिविगाळ करून नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे ते वैतागले होते. त्यामुळेच त्यांनी हे कृत्य घडवून आणले. तसेच दारूची पार्टी करण्याचे आमिष दाखवून त्याला आणले आणि त्याची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड