शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पती झाला हैवान! लग्नानंतर अवघ्या 27 दिवसांत पत्नीचा काढला काटा; हनिमूनला केलं भयंकर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 10:34 IST

Crime News : हनिमूनसाठी आलेल्या महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे 27 दिवस झाले होते.

नवी दिल्ली - लग्नानंतर अवघ्या 27 दिवसांत पतीच हैवान झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. गुजरात येथून हनिमूनसाठी आलेल्या महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे 27 दिवस झाले होते. हत्या केल्यानंतर पतीने प्रकृती अस्वस्थामुळे मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. पतीने महिलेच्या तोंडात पानं भरली होती. फांदीने गळा आवळून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपी पतीचा गुजरातमधील वलसाडमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा व्यवसाय आहे.

माउंट अबू पोलीस स्टेशनचे सीओ योगेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय जॉली कुमार, रा. खतलवाडा, वलसाड (गुजरात) हा त्याची पत्नी रुचिका (28) सोबत 10 जानेवारी रोजी माउंट अबूला हनिमूनसाठी आला होता. गुजरात तोरणा भवन येथे ते राहिले होते. 10 जानेवारी रोजी अचानक रुचिकाची तब्येत बिघडली. उलट्या झाल्यानंतर तिला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी रुचिकाला मृत घोषित केले. डॉ.नवीन शर्मा, तनवीर हुसेन आणि कुसुम लता अग्रवाल यांनी रुचिकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

सरकारी हॉस्पिटलमधील डॉ नवीन यांनी सांगितलं की, रुचिकाच्या मृत्यूनंतर 1 महिना आणि 3 दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. महिलेचे सर्व अवयव बरोबर असल्याचे अहवालात आले आहे. महिलेचा फांदीने गळा आवळून खून करण्यात आला. रुचिकाच्या घशापासून तोंडापर्यंत अनेक पाने भरली होती, त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. महिलेच्या गळ्यात मूठभर पाने भरलेली आढळून आली. रुचिकाचा आधी एका फांदीने गळा आवळण्यात आला. त्यानंतर तिचं तोंड जाड उशीने किंवा इतर कोणत्याही वस्तूने दाबण्यात आलं त्यानंतर हाताने गळा आवळूनही हत्या करण्यात आली आहे.

रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल 

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर रुचिकाचे वडील हरीश भाई रहिवासी वलसाड गुजरात यांनी गुरुवारी माउंट अबू पोलीस ठाण्यात रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हरीशने पोलिसांना सांगितले की, रुचिकाचे गुजरातमध्ये 13 डिसेंबर 2021 रोजी जॉलीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या 24 दिवसांनंतर हे जोडपे गुजरातमधून माउंट अबूला हनिमूनसाठी निघाले होते. अंबाजीचं दर्शन घेतल्यानंतर 7 जानेवारीला त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. यानंतर 9 जानेवारीला फोन करून जॉलीने रुचिकाची तब्येत अचानक बिघडली आणि रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न