शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

पती झाला हैवान! लग्नानंतर अवघ्या 27 दिवसांत पत्नीचा काढला काटा; हनिमूनला केलं भयंकर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 10:34 IST

Crime News : हनिमूनसाठी आलेल्या महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे 27 दिवस झाले होते.

नवी दिल्ली - लग्नानंतर अवघ्या 27 दिवसांत पतीच हैवान झाल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. गुजरात येथून हनिमूनसाठी आलेल्या महिलेची तिच्या पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे 27 दिवस झाले होते. हत्या केल्यानंतर पतीने प्रकृती अस्वस्थामुळे मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं आहे. पतीने महिलेच्या तोंडात पानं भरली होती. फांदीने गळा आवळून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. महिलेच्या वडिलांनी जावयाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आरोपी पतीचा गुजरातमधील वलसाडमध्ये सीसीटीव्ही लावण्याचा व्यवसाय आहे.

माउंट अबू पोलीस स्टेशनचे सीओ योगेश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय जॉली कुमार, रा. खतलवाडा, वलसाड (गुजरात) हा त्याची पत्नी रुचिका (28) सोबत 10 जानेवारी रोजी माउंट अबूला हनिमूनसाठी आला होता. गुजरात तोरणा भवन येथे ते राहिले होते. 10 जानेवारी रोजी अचानक रुचिकाची तब्येत बिघडली. उलट्या झाल्यानंतर तिला ग्लोबल हॉस्पिटलमध्ये नेले. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेलं असता डॉक्टरांनी रुचिकाला मृत घोषित केले. डॉ.नवीन शर्मा, तनवीर हुसेन आणि कुसुम लता अग्रवाल यांनी रुचिकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून झाला मोठा खुलासा

सरकारी हॉस्पिटलमधील डॉ नवीन यांनी सांगितलं की, रुचिकाच्या मृत्यूनंतर 1 महिना आणि 3 दिवसांनी पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आहे. महिलेचे सर्व अवयव बरोबर असल्याचे अहवालात आले आहे. महिलेचा फांदीने गळा आवळून खून करण्यात आला. रुचिकाच्या घशापासून तोंडापर्यंत अनेक पाने भरली होती, त्यामुळे तिला श्वास घेता येत नव्हता. महिलेच्या गळ्यात मूठभर पाने भरलेली आढळून आली. रुचिकाचा आधी एका फांदीने गळा आवळण्यात आला. त्यानंतर तिचं तोंड जाड उशीने किंवा इतर कोणत्याही वस्तूने दाबण्यात आलं त्यानंतर हाताने गळा आवळूनही हत्या करण्यात आली आहे.

रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल 

पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर रुचिकाचे वडील हरीश भाई रहिवासी वलसाड गुजरात यांनी गुरुवारी माउंट अबू पोलीस ठाण्यात रुचिताचा पती जॉली कुमारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. हरीशने पोलिसांना सांगितले की, रुचिकाचे गुजरातमध्ये 13 डिसेंबर 2021 रोजी जॉलीसोबत लग्न झाले होते. लग्नाच्या 24 दिवसांनंतर हे जोडपे गुजरातमधून माउंट अबूला हनिमूनसाठी निघाले होते. अंबाजीचं दर्शन घेतल्यानंतर 7 जानेवारीला त्यांनी हॉटेलमध्ये मुक्काम केला. यानंतर 9 जानेवारीला फोन करून जॉलीने रुचिकाची तब्येत अचानक बिघडली आणि रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न