शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

संतापजनक! 5 मिनिटं उशीर झाल्याने मुख्याध्यापकाची विद्यार्थ्याला बेदम मारहाण; दोन्ही पाय फ्रॅक्चर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 11:11 IST

विद्यार्थ्याला शाळेत यायला फक्त पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्याला शाळेत यायला फक्त पाच मिनिटं उशीर झाला म्हणून मुख्याध्यापकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. बेदम मारहाणी मुलाच्या पायाची हाडं तुटली असून दोन्ही पायाला फ्रॅक्चर झालं आहे. पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील विद्यार्थ्याचे आई-वडील आणि नातेवाईकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शामली येथे आदर्श मंडी परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. जय जवान जय किसान इंटर कॉलेमधील मुख्याध्यापकांनी आठवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. त्याची चूक एवढीच होती की तो फक्त पाच मिनिटं शाळेत उशीरा आला. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. वडिलांनी आपल्या मुलावर उपचार केले आणि त्यानंतर थोडं बरं वाटल्यावर त्याला शाळेत सोडलं. 

मुलाच्या दोन्ही पायाला प्लास्टर

विद्यार्थी पाच मिनिटं उशीरा आला. त्याने शिस्त मोडली म्हणून त्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली. मारहाणीत मुलाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले. वडिलांनी मुलाला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेले. तिथे एक्स रे काढला. त्यावेळी हे सत्य समोर आलं. या मुलावर सध्या उपचार सुरू आहेत. मुलाच्या दोन्ही पायाला प्लास्टर केलं आहे. पालकांनी मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :SchoolशाळाUttar Pradeshउत्तर प्रदेश