शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भयंकर! मोबाईल दिला नाही म्हणून नववधूने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:29 IST

Crime News : नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलसाठी एका नववधूने टोकाचं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यामध्ये नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी रात्री तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मेडिकल कॉलेज झाशी येथे जाण्यास सांगितलं. 

उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. चंद्रशेखर यांनी आपली मुलगी अंगुर हिचं लग्न नरेंद्र सोबत ठरवलं होतं. तिने आपला दीर सुमितच्या माध्यमातून सासऱ्यांकडे मोबाईलची मागणी केली होती.

सासऱ्याने देखील मोबाईल फोन देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मोबाईल न मिळाल्याने तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सासरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तिच्या सर्व इच्छा नेहमीच पूर्ण केल्या जात होत्या. पण त्यानंतर पुन्हा आता ती मोबाईल हवा असा हट्ट करत होती. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी