शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! मोबाईल दिला नाही म्हणून नववधूने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:29 IST

Crime News : नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलसाठी एका नववधूने टोकाचं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यामध्ये नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी रात्री तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मेडिकल कॉलेज झाशी येथे जाण्यास सांगितलं. 

उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. चंद्रशेखर यांनी आपली मुलगी अंगुर हिचं लग्न नरेंद्र सोबत ठरवलं होतं. तिने आपला दीर सुमितच्या माध्यमातून सासऱ्यांकडे मोबाईलची मागणी केली होती.

सासऱ्याने देखील मोबाईल फोन देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मोबाईल न मिळाल्याने तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सासरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तिच्या सर्व इच्छा नेहमीच पूर्ण केल्या जात होत्या. पण त्यानंतर पुन्हा आता ती मोबाईल हवा असा हट्ट करत होती. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी