शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

लेकीला न्याय मिळावा म्हणून बापाची धडपड; चितेवरुन बाहेर काढला अर्धवट जळालेला मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 18:06 IST

Crime News : एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर जळत्या चितेवरुन महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.

नवी दिल्ली - राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीच्या तक्रारीनंतर जळत्या चितेवरुन महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मृत मुलीचे वडील होते. त्यांनी आपल्या जावयाविरोधात मुलीची हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तब्बल 5 वर्षे बाप आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लढत होता. आता पाच वर्षांनंतर त्यांच्या मुलीला न्याय मिळाला असून तिची हत्या करणारा तुरुंगात आहे. 

गुरुवारी आरोपी पतीला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सोबतच 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करोली जिल्ह्यातील सुरोठ निवासी मदनलाल जोगी यांच्या मुलीचं लग्न रसेली निवासी हंसेसोबत झालं होतं. 15 मार्च 2017 रोजी पती राकेश आणि त्याच्या नातेवाईकांनी हुंड्याची मागणी करीत हेमाची हत्या केली. 

गुपचूपपणे यानंतर हेमावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला. मात्र याची सूचना मिळताच मृत महिलेचेवडील तेथे पोहोचले. त्यांनी पाहिलं की, मुलीचा मृतदेह चितेवर जळत आहे. पोलिसांना याबाबत सांगितलं, यानंतर हेमाचा अर्धवट जळालेला मृतदेह चितेवरुन बाहेर काढला आणि त्याचं पोस्टमार्टम करण्यात आलं. 

हेमाच्या पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाच वर्षांपर्यंत वडील आपल्या मृत मुलीला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत होते. मुलीची हत्या करणाऱ्या तिच्या पतीला कडक शिक्षा व्हावी यासाठी ते लढत होते. गुरुवारी न्यायालयाने पती राकेशला दोषी मानत त्याला शिक्षा सुनावली. न्यायालयाने त्याला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthanराजस्थान