शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भयंकर! चोरीच्या आरोपाखाली 'त्याला' पकडला पण 24 तासांत मृत्यू झाला; कुटुंबीयांचा गंभीर आरोप  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 10:42 IST

Crime News : पोलिसांनी पकडल्यानंतर केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

नवी दिल्ली - कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीमुळे तरुणाने जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. चोरीच्या आरोपाखाली तरुणाला पकडण्यात आलं होतं पण त्यानंतर 24 तासांतच त्याचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर केलेल्या अमानूष मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या असंख्य जखमी आपल्या भावाच्या शरीरावर दिसत असल्याचा दावा मृत तरुणाच्या बहिणीने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील कानपूर परिसरातील कल्लू नावाच्या एका तरुणाला पोलिसांनी संशयित म्हणून चोरीच्य़ा आरोपाखाली पकडलं होतं. त्या रात्री तरुणाला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आलं. मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमधून कुटुंबीयांना फोन आला आणि तरुणाला घेऊन जायला सांगण्यात आलं.

तरुणाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा 

तरुणाची तब्येत बरी नसून त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी कुटुंबीयांना दिला. पण कुटुंबीय कल्लूला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. कल्लूच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा जागोजागी दिसत होत्या. तो या वेदना सहन करत होता. अखेर वेदना सहन न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

कल्लूचा मृत्यू हा पोलिसांनीच केलेली हत्या 

कल्लूचा मृत्यू हा पोलिसांनीच केलेली हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कल्लूला पोलीस घेऊन गेले त्यावेळी त्याची तब्येत एकदम ठिक होती. असं असताना 24 तासांत असं काय घडलं की त्याचा मृत्यू व्हावा, असा सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस