शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: नाराज प्रेयसीसाठी बॉयफ्रेंड कार घेऊन आला; लोकांना वाटले अपहरण, दोघे मोमोज खाताना सापडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 19:28 IST

एसएसपी अखिलेश चौरसिया यांनी वायरलेसवरून सर्व पोलीस ठाण्यांना वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे पोलिसही सतर्क झाले आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या.

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये सकाळी सकाळी सनसनी पसरली, एका तरुणीचे कारवाल्यांनी अपहरण केल्याची बाब कोणीतरी पसरवली आणि खळबळ उडाली. काही लोकांनी सांगितले की सकाळी सा़डे नऊच्या सुमारास एका तरुणीला काही लोकांनी कारमध्ये खेचले आणि पळवून घेऊन गेले. पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसही कामाला लागले. परंतू, तपासावेळी पोलिसांना जे आढळले ते पाहून ते ही काही काळ थबकले होते. 

एसएसपी अखिलेश चौरसिया यांनी वायरलेसवरून सर्व पोलीस ठाण्यांना वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. यामुळे पोलिसही सतर्क झाले आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. वाहनांची तपासणी करण्यात येत होती. इज्जत नगर पोलिसांनी घटनास्थळी जात चौकशी सुरु केली. यावेळी कोणते वाहन होते, रंग कोणता होता, मुलीने कोणता ड्रेस घातला होता आदी चौकशी सुरु झाली. 

तिथे उपस्थित काहीजणांना त्यांना ऐकीव असलेली माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या रस्त्याने पुढे पाठलाग सुरु केला. तेव्हा वर्णन केलेली गाडी एका हॉटेलसमोर थांबलेली दिसली. तिथे ती तरुणी आणि तिचा बॉयफ्रेंड मस्त मजेत मोमोज खात होते. 

पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता पिलीभीत जिल्ह्याच्या विलासपूरचा निवासी तरुण आणि भोजीपुरातील तरुणी यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. मुलगा चाट स्टॉल चालवतो आणि मुलगी बी.एड. शिकत आहे. दोघांमध्ये कशावरून तरी दुरावा निर्माण झाला होता. तो तरुण आपल्या मित्रांसोबत कारने प्रेयसीची समजूत घालण्यासाठी आला होता. बाचाबाची झाल्यानंतर प्रेयसीला शंभर फुटी रोडवर त्यांनी कारमध्ये बसवले. हा सर्व प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी पाहिल्यानंतर अपहरणाचा संशय आला आणि सारा प्रकार घडला. पोलिसांनी दोघांनाही समजावले आणि या अपहरण नाट्यावर पडदा पडला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश