शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

चोरांचा कारनामा! तब्बल 6 क्विंटल काजूवर मारला डल्ला; पोलीस चौकशीत सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 15:40 IST

Crime News : चोरट्यांनी पाच-दहा पाकिटं नाही, तर तब्बल 6 क्विंटल काजूची चोरी केली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये चोरांनी कमाल केली आहे. चोर जेव्हा चोरी करतात तेव्हा त्यांचे अनेक हेतू असतात. मात्र ज्या हेतूने चोरांनी चांदणी चौकात काजूवर डल्ला मारला ते आश्चर्यकारक आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत चोरट्यांनी चांगल्या आरोग्यासाठी काजूची चोरी केली आहे. चोरट्यांनी पाच-दहा पाकिटं नाही, तर तब्बल 6 क्विंटल काजूची चोरी केली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली. दिल्ली पोलिसांनी तीन काजू चोरांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर दिल्लीतील लाहोरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील चांदनी चौकातून 580 किलो काजू चोरीची घटना समोर आली आहे. या प्रकरणी दुकान मालकाने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी 580 किलो काजूसह तीन आरोपींना अटक केली आहे. चांदणी चौकातील एका ड्रायफ्रुटच्या दुकानातून दोन दिवसांपूर्वी चोरीची ही घटना घडली होती. मात्र अवघ्या 36 तासांत पोलिसांनी या चोरांना अटक केली आहे. 

पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केल्यानंतर या चोरांनी चांगल्या आरोग्यासाठीच काजूची चोरी केल्याचं सांगितलं आहे. हे चोर व्यायामशाळेत जातात आणि चांगली बॉडी होण्यासाठी काजू मोठ्या प्रमाणात लागतात, असे सांगण्यात आले. त्यामुळेच त्यांनी ही चोरी करण्याचा निर्णय घेतला. या चोरट्यांवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. या काजूची किंमत सुमारे पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांची ओळख पटवली आणि त्यानंतर काजू चोर पकडले गेले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली