शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 19:23 IST

Crime News : पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. काही वाद हे विकोपाला जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका महिलेचे पतीसोबत भांडण झाल्यावर तिने आपल्या तीन मुलांना विष पाजून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीतील ढढ़नी भानमल राय गावात एका महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर महिलेने कोणताच विचार न करता रागाच्या भरात तिच्या तीन मुलांना विष पाजले. विष प्यायल्यानंतर तिन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि मुलांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी महिलेचं पती आणि दिरासोबत मोबाईलवर वाद झाला. यामुळे महिलेला राग आला आणि तिने तिची दोन मुलं हिमांशू (11), प्रियांशु (8) आणि मुलगी सुप्रिया (7) यांची हत्या केली. दुपारी चार वाजता त्यांना चहामध्ये विष मिसळून दिलं. मुलांची प्रकृती बिघडायला लागल्यावर महिलेने याबाबत माहिती दिली. 

घरातील लोकांनी मुलांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हिमांशू आणि सुप्रियाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं. पण नंतर उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. महिलेला चार मुलं आहेत. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिचा चौथा मुलगा हा बाहेर गेला होता. त्यामुळे तो वाचला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश