शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

माता न तू वैरिणी! आईनेच घेतला 3 मुलांचा जीव; चहामधून दिलं विष, कारण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 19:23 IST

Crime News : पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये नेहमीच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद होत असतात. काही वाद हे विकोपाला जातात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. पतीसोबत भांडण झाल्यावर पत्नीने हे टोकाचं पाऊल उचललं. भांडणाचा आपल्या मुलांवर राग काढत तिने त्यांनाच विष दिल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. एका महिलेचे पतीसोबत भांडण झाल्यावर तिने आपल्या तीन मुलांना विष पाजून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या गाझीपूरच्या सुहवाल पोलीस स्टेशन हद्दीतील ढढ़नी भानमल राय गावात एका महिलेचे तिच्या पतीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर महिलेने कोणताच विचार न करता रागाच्या भरात तिच्या तीन मुलांना विष पाजले. विष प्यायल्यानंतर तिन्ही मुलांची प्रकृती अचानक बिघडू लागली आणि मुलांचा मृत्यू झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोमवारी महिलेचं पती आणि दिरासोबत मोबाईलवर वाद झाला. यामुळे महिलेला राग आला आणि तिने तिची दोन मुलं हिमांशू (11), प्रियांशु (8) आणि मुलगी सुप्रिया (7) यांची हत्या केली. दुपारी चार वाजता त्यांना चहामध्ये विष मिसळून दिलं. मुलांची प्रकृती बिघडायला लागल्यावर महिलेने याबाबत माहिती दिली. 

घरातील लोकांनी मुलांना जिल्हा रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी हिमांशू आणि सुप्रियाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं. पण नंतर उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झाला. महिलेला चार मुलं आहेत. पण जेव्हा ही घटना घडली तेव्हा तिचा चौथा मुलगा हा बाहेर गेला होता. त्यामुळे तो वाचला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश