शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

...अन् 45 दिवसांचा संसार झाला उद्ध्वस्त! पत्नीने Video Call वर कापली नस; पतीनेही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 16:08 IST

Crime News : एक जोडप्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान लखनऊमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या 45 दिवसांत संसार उद्ध्वस्त झाला आहे. एक जोडप्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पत्नीने व्हिडीओ कॉलवर हाताची नस कापली तर त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचं 45 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं आणि फोनवर वाद झाला असता पत्नीने हाताची नस कापून घेतली. त्यानंतर पतीने देखील आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं आहे.

लखनऊमधील परसादी खेडा, पारा येथे राहणाऱ्या विवेक प्रसादचे 29 नोव्हेंबर रोजी डूडा कॉलनीत राहणाऱ्या रितूसोबत लग्न झालं होतं. विवेकचे वडील गोकर्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शुक्रवारी सकाळी ड्युटीवर गेला होता आणि त्यांची (गोकर्ण यांची पत्नी) पत्नी संगीता घरी होती. संगीता गच्चीवर बसल्या होत्या. 2 जानेवारी रोजी सून रितू तिच्या मामाच्या घरी गेली होती आणि तेव्हापासून ती तिथेच राहत होती.

वडिलांनी सांगितलं की, रितूने शुक्रवारी दुपारी विवेकला फोन केला होता आणि त्यावेळी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर रितूने ब्लेडने तिच्या हाताची नस कापली आणि विवेकला व्हिडीओ कॉल केला. दुसरीकडे व्हिडीओ कॉलवर पत्नीची अवस्था पाहून विवेक अस्वस्थ झाला आणि तो आपल्या खोलीत गेला. जिथे त्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.

विवेकनं गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विवेकची आई गच्चीवरून खाली आल्यावर घरच्यांना हा प्रकार कळला. त्यांना खोलीत मुलगा लटकलेला अवस्थेत दिसला आणि त्यानंतर त्यांनी लोकांना बोलावलं. नातेवाईकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विवेकचा मृतदेह खाली उतरवून लोकबंधू रुग्णालयात नेला. मात्र डॉक्टरांनी विवेकला रुग्णालयात मृत घोषित केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न