शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Suicide in Supaul Bihar: आई-वडील, २ मुली अन् १ मुलगा…; लटकलेल्या अवस्थेत ५ मृतदेह सापडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 11:45 IST

हे संपूर्ण प्रकरण राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे, शुक्रवारी रात्री उशीरा या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे

ठळक मुद्देरुममधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजारील लोकांनी दरवाजा ठोठावला, पण काहीही उत्तर मिळालं नाहीपोलिसांनी या घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर आतमधील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.आर्थिक परिस्थितीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सुपौल – बिहारच्या सुपोल परिसरात एकाच कुटुंबातील ५ सदस्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माहितीनुसार, ३ मुलांसह पती-पत्नीने एकाच रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. मृतकांमध्ये पती-पत्नीसह २ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह एकाच रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले, ज्यावेळी या रुममधून दुर्गंध बाहेर येऊ लागला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

हे संपूर्ण प्रकरण राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे, शुक्रवारी रात्री उशीरा या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे. रुममधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजारील लोकांनी दरवाजा ठोठावला, पण काहीही उत्तर मिळालं नाही, त्यानंतर लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलवण्यात आले, पोलिसांनी या घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर आतमधील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी रुमचा दरवाजा उघडला तेव्हा ५ सदस्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहायला मिळाले, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि तातडीने तपासाला सुरुवात केली, सुपौल येथे एसपी मनोज कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहे. सध्या हे प्रकरण आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

एसपी मनोज कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, या कुटुंबातील प्रमुख व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यात यश आलं नाही असं शेजाऱ्यांनी सांगितले, कुटुंब कोळसा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात, कुटुंबात कोणीही जास्त शिकलेले नाही, फक्त मुलगा शिक्षण घेत होता, मुलींना शिक्षण नव्हतं, सध्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर या ५ जणांच्या मृत्यूबाबत स्पष्ट सांगता येईल, सध्या तपास सुरु असल्याने काहीही सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं, मात्र एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहार