शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

रावेर दंगलीतील नुकसानीचा खर्च आरोपींकडून होणार वसूल,  प्रस्ताव सादर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 00:22 IST

 संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू असताना रावेर येथे दोन गटात दंगळ उसळली होती. त्यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते.

जळगाव- रावेर येथे २२ मार्च रोजी उसळलेल्या दंगलीत झालेले नुकसान गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींकडून वसूल करण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस विभागाने जिल्हाधिका-यांकडे सादर केला आहे. मुंबई पोलीस अधिनियमातील तरतूदीच्या आधारावर महाराष्टÑात प्रथमच असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ६ कोटी २० लाख ९१ हजार ५५ रुपयांचे नुकसान या दंगलीच झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम उपस्थित होते. संपूर्ण देशात २२ मार्च रोजी जनता संचारबंदी लागू असताना रावेर येथे दोन गटात दंगळ उसळली होती. त्यात एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. सरकारी व खासगी मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निष्पाप लोकांना या दंगलीची झळ बसली होती. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहोम,रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे व उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे यांनी रावेर दंगलीचा अभ्यास करुन तेथील संवेदनशील भाग अशांत म्हणून घोषीत करण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

काय आहे कायदामुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५१ (३) (१) व  ५१ (४) (ब)अन्वये दंगलीत किंवा एखाद्या आपला हेतू साध्य करण्यासाठी हानी तसेच कोणाचा मृत्यू झाला असेल तर संबंधितांकडून त्याची नुकसान भरपाई करण्याची तरतूद आहे. ही नुकसान भरपाई वैयक्तिक किंवा विविध कराच्या माध्यमातून पालिकेने वसूल करायची व वसुल रकमेचे वाटप मृत व्यक्ती, नुकसान झालेल्या संस्था, वाहने याचे वर्गीकरण करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना आहेत. पोलीस दलाने कायद्याचा आधार घेऊन हा प्रस्ताव तयार करुन जिल्हाधिकाºयांकडे पाठविला आहे.

रावेरात ७४ वर्षात ४२ दंगलीरावेर शहरात १९४६ ते मार्च २०२० या कालावधीत ७४ वर्षात धार्मिक तेढ निर्माण करणा-या तब्बल ७४ दंगली झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. प्रत्येक दंगलीत गुन्हे दाखल करणे, आरोपी अटक करणे, त्यांना कारागृहात पाठविणे व कायद्यान्वे शिक्षा या प्रचलित कायद्यान्वये कारवाई केली गेली आहे. आता प्रथमच नुकसान करणा-यांकडून त्याची वसुली करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. 

 या गुन्ह्यात निष्पन्न व अटक झालेल्या काही आरोपींवर मागील रेकॉर्ड बघून एमपीडीएअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. दंगलीमुळे काय नुकसान होते, दंगेखोरांमध्ये वचक बसावा यासाठी त्यांच्याकडूनच त्याची वसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कायद्यात देखील तशी तरतूद असून त्याचाच आधार घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

रावेर दंगल दृष्टीक्षेपातमयत :  १ पुरुषगंभीर जखमी : २ पुरुषएकुण आरोपी : ३७७अटक आरोपी : १५३एकुण गुन्हे :   ७दोषारोपपत्र दाखल :   १६ जून २०२०पोलीस बंदोबस्त खर्च :   ६ कोटी १४ लाख ९२ हजार ५९जाळपोड व तोडफोड नुकसान :    ५ लाख २१ हजारपालिकेचा व्यवस्थापनात झालेला खर्च : ७७ हजारमहावितरण कंपनीचे नुकसान : १ हजार

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaverरावेरJalgaonजळगाव