शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

Coronavirus: धक्कादायक! आयसोलेशनमध्ये गर्भवती महिलेवर आरोग्य कर्मचाऱ्याने केला दोन दिवस बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 14:19 IST

माझी सून रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार होती.

नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही गेल्या २४ तासांत १,०३५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने देशातील एकूण बाधितांची संख्या ८ हजार ४१७ च्या घरात गेली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यत देशात २९० लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

बिहारमधील गयाच्या अनुग्राह नारायण मगध मेडिकल कॉलेज व रुग्णालयात कोरोनाच्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालयातील एका आरोग्य कर्मचाऱ्याने सलग दोन दिवस महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप संबंधित महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणात महिलेच्या सासूने रोशनगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून येत होती. यासाठी 25 मार्च रोजी ही महिला लुधियानाहून आपल्या पतीसमवेत रुग्णालयात आली होती. परंतु महिलेची कोरोनाची चाचणी केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर महिलेला रुग्णालयातून सोडण्यात आले. पण घरी गेल्यानंतर महिलेला जास्त रक्तस्त्राव सुरु झाला आणि तिचा  दुसर्‍याच दिवशी मृत्यू झाला असल्याचे महिलेच्या सासूने सांगितले. 

माझी सून रुग्णालयात घडलेल्या प्रकारानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार होती. परंतु रुग्णालयातील गेटमॅनने तिला इज्जतीची भीती दाखवली. ती घाबरली आणि तिने तक्रार केली नाही असा दावा महिलेच्या सासूने केला आहे. माझी सून व तिच्या जन्मलेल्या बाळाच्या मृत्यूला आरोग्य कर्मचारी जबाबदार असल्याचे सासूने सांगितले.

लॉकडाऊनमध्ये लहान मुलांच्या अत्याचारात झाली वाढ

लॉकडाऊनमध्ये केवळ महिलाच नाहीत तर मुलेही घरातच बंद आहेत. ही त्याची मोठी समस्या बनली आहे कारण त्याला अजूनही छळ करणाऱ्यांसोबत 24 तास घालवावे लागत आहे. हेच कारण आहे की 20 ते 31 मार्च दरम्यान 'चाईल्डलाईन 1098' ला देशभरातून 3 लाख 7 हजार कॉल आले. चाइल्डलाइन इंडियाचे उपसंचालक हर्लीन वालिया म्हणाले की, 92,105 कॉलपैकी 30 टक्के कॉल मुलांना त्रास व हिंसाचारापासून वाचवण्यासाठी केले गेले. 24 मार्चपासून देशात लॉकडाउन लागू आहे. म्हणजेच लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात ही वाढ झाली आहे. वालिया यांच्या मते, लॉकडाऊननंतर अशा तक्रारींमध्ये 50% वाढ झाली आहे.

महिलांवरील अत्याचारही वाढले

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, 24 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात महिलांवरील अत्याचार केल्याच्या 1,257 तक्रारी आल्या. अशी भीती अशी आहे की, अशा बऱ्याच घडल्या असतील, परंतु छळ केल्यानंतर  चोवीस तास घरीच असल्याने भीतीपोटी महिला तक्रार नोंदवू शकणार नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRapeबलात्कारBiharबिहारIndiaभारतDeathमृत्यू