शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 21:32 IST

२४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देहत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे.

मुंबई : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सगळे जग हादरून गेले असताना त्याचा एकमेव सकारात्मक परिणाम गुन्हेगारीवर झाला आहे. लॉकडाउन झाल्यापासून राज्यात शरीरासंबंधी  व रस्त्यावरील गुन्हे जवळपास थंडावले आहेत. हत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. २४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत. 

पोलीस ठाण्यातील बहुतांश अधिकारी व अंमलदार हे हद्दीत बंदोबस्त व नाकाबंदीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे पोलीस ठाणी ही सुनीसुनी व मोकळी असल्याची परिस्थिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. 

कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर जाण्यास मुभा आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. अन्नधान्य, भाजीपाला व मेडिकल्स वगळता सर्व अन्य बाजारपेठा पुर्णपणे बंद असल्याने त्याठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसला आहे. कार्यालये बंद असल्याने रस्त्यावर गर्दी नसल्याने महिला, तरुणीवरील अत्याचार तसेच दागिने, पर्स पळविणे, खिसे कापणे यासारखे प्रकार थांबला आहे.

सध्या ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर व्हायरल करणे, त्यातून बदनामी करणे आदीबाबतच्या गुन्ह्यामध्ये मात्र घडत आहेत. मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यात एरवी दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ५ ते ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण पुर्णपणे थांबले आहे.  दाखल झाला तर एखादा अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल होतो, त्याशिवाय आयपीसी १८८ कलमान्वये बंदी आदेश मोडणे आणि सायबरचे गुन्हे मात्र दाखल होत आहेत, अशी कबुली वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

 

कोरोनाच्या प्रतिबंधाला प्राधान्यसमाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे. लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे.मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )समाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे .लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे. - मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रcyber crimeसायबर क्राइमcorona virusकोरोना वायरस बातम्या