शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात गुन्हेगारी झाली 'लॉकडाऊन', राज्यात केवळ बंदी आदेश, सायबर गुन्हेच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 21:32 IST

२४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत.

ठळक मुद्देहत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे.

मुंबई : कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे सगळे जग हादरून गेले असताना त्याचा एकमेव सकारात्मक परिणाम गुन्हेगारीवर झाला आहे. लॉकडाउन झाल्यापासून राज्यात शरीरासंबंधी  व रस्त्यावरील गुन्हे जवळपास थंडावले आहेत. हत्या, खूनाचा प्रयत्न, दरोडा, बलात्कार, विनयभंगापासून सोनसाखळी चोरीसारख्यापर्यंतच्या  घटनांना आपसुकच आळा बसला आहे. २४ मार्चपासून केवळ संचारबंदी आदेशाचे उल्लंघन आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर क्राईमच्या घटना घडत आहेत. 

पोलीस ठाण्यातील बहुतांश अधिकारी व अंमलदार हे हद्दीत बंदोबस्त व नाकाबंदीच्या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे पोलीस ठाणी ही सुनीसुनी व मोकळी असल्याची परिस्थिती आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरातच नव्हे राज्यभरातील सर्व लहान, मोठ्या शहरात थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. 

कोरोनाच्या विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यात २४ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना अत्यावश्यक कारणांसाठी बाहेर जाण्यास मुभा आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी झाली आहे. अन्नधान्य, भाजीपाला व मेडिकल्स वगळता सर्व अन्य बाजारपेठा पुर्णपणे बंद असल्याने त्याठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसला आहे. कार्यालये बंद असल्याने रस्त्यावर गर्दी नसल्याने महिला, तरुणीवरील अत्याचार तसेच दागिने, पर्स पळविणे, खिसे कापणे यासारखे प्रकार थांबला आहे.

सध्या ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर व्हायरल करणे, त्यातून बदनामी करणे आदीबाबतच्या गुन्ह्यामध्ये मात्र घडत आहेत. मुंबईतील ९२ पोलीस ठाण्यात एरवी दररोज प्रत्येक पोलीस ठाण्यात सरासरी ५ ते ६ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतात. लॉकडाऊनमुळे त्याचे प्रमाण पुर्णपणे थांबले आहे.  दाखल झाला तर एखादा अदखलपात्र (एनसी) गुन्हा दाखल होतो, त्याशिवाय आयपीसी १८८ कलमान्वये बंदी आदेश मोडणे आणि सायबरचे गुन्हे मात्र दाखल होत आहेत, अशी कबुली वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.

 

कोरोनाच्या प्रतिबंधाला प्राधान्यसमाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे. लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे.मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )समाजात कायदा व सुव्यवस्था कायम रहाण्यासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात.सध्या राज्यातील कोरोनाच्या  संकटाला हटविणे ,हे आमचे प्राधान्य आहे ,त्याअनुषंगाने कार्यवाही केली जात आहे .लॉकडाउनमुळे नागरिक घरात थांबून असल्याने अन्य गुन्ह्यांच्या घटनांना आपसूक अटकाव बसला आहे. - मिलिंद भारंबे ( विशेष पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुव्यस्था, पोलीस मुख्यालय )

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रcyber crimeसायबर क्राइमcorona virusकोरोना वायरस बातम्या