शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

coronavirus: गुडवणवाडीमध्ये पाण्याच्या बोअरिंगवरून हाणामारी; पाच जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 00:58 IST

गुडवणवाडीमध्ये आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेलला चांगले पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई तेथे नाही.

कर्जत : तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त गुडवणवाडीमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. त्यात तेथे असलेल्या बोअरवेलचा हातपंप कोणीतरी तोडला होता. त्याबाबत स्थानिक आदिवासी व्यक्तीने ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मोबाईलमध्ये फोटो काढून माहिती दिली. बोअरवेलची माहिती दिल्याबद्दल १७ लोकांच्या जमावाने पाच तरुणांना मारहाण करण्याची घटना घडली. कर्जत पोलीस ठाण्यात १७ जणांवर गुन्हा दाखल झाला असून पाच जखमींवर कशेळे ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.गुडवणवाडीमध्ये आदिवासी लोकांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून खाली यावे लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीने गेल्यावर्षी खोदलेल्या बोअरवेलला चांगले पाणी असल्याने सध्या पूर्वीसारखी पाणीटंचाई तेथे नाही. असे असताना तेथे असलेल्या बोअरवेलचा हातपंप १२ मे रोजी कोणीतरी तोडला. त्याबद्दल वाडीमधील व्यक्तीने फोटो काढून बोरिवली सरपंच वृषाली क्षीरसागर यांनी कळविले. हातपंप तोडला आणि फोटो कोणी काढले. याची कोणतीही खात्रीलायक माहिती नसताना केवळ संशयावरून अनंता पुंजारा यांच्या घरात घुसून १७ जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अनंता पुंजारा यांना सोडवण्यासाठी गेलेल्यांना मारहाण करण्यात आली.१२ मे रोजी सायंकाळी साडे सात वाजता ही घटना गुडवणवाडीमध्ये घडली. मारहाण करणाऱ्या सुरेश खंडवी, वासुदेव खंडवी, दीपक खंडवी, नयन खंडवी, लक्ष्मण खंडवी, अनंता खंडवी, कमलाकर खंडवी, जगदीश पारधी, नरेश खंडवी, किरण खंडवी, मोहन पारधी, धनेश पारधी, मंगल निर्गुडा, विजय निर्गुडा, हरिष खंडवी आणि सखाराम पारधी अशा १७ जणांवर गुन्हा दाखल के ला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईRaigadरायगड