शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

५ लग्न, मर्डर मिस्ट्री अन् काँग्रेस कनेक्शन, ४८ दिवसांनी रहस्य उलगडलं; ‘खूनी पोलीस’चा डाव फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 10:49 IST

अजय देसाईनं स्वीटीसोबत २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. परंतु त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

ठळक मुद्दे५ जूनपासून स्वीटीचा शोध सुरू होता तो शेवटपर्यंत पोहचला ज्याचा विचारही कुणी केला नसेलस्वीटी बेपत्ता होण्यापूर्वी अजय आणि स्वीटीमध्ये भांडण झाल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे अजयची चौकशी होणारच होती.अजय स्वत: स्वीटीचा शोध घेत होता परंतु त्याने बायको बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिलीच नव्हतीपोलिसांनी अजयचा तपास सुरू केला तेव्हा तो स्वीटीबाबत उडवाउडवीची उत्तरं देत होता

अहमदाबाद – गुजरातमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अमेरिकेत राहणाऱ्या एका NRI सोबत लग्न केले. परंतु काहीच दिवसांनी त्यांनी तलाक घेतला त्यानंतर ही महिला गुजरातला परतली. तेव्हा तिची भेट गुजरातमधील पोलीस निरीक्षकासोबत झाली. दोघांमध्ये जवळीक वाढली त्यानंतर एकेदिवशी दोघांनी कुणालाही खबर न लागता एका मंदिरात लग्न केले. मात्र ही गोष्ट माहिती नसल्याने पोलिसाच्या कुटुंबाने त्याचं दुसरं लग्न ठरवलं. ही बाब पहिल्या पत्नीला कळाली. त्यानंतर ती महिला गायब झाली आणि ४८ दिवसांनी पहिल्या पत्नीचं सत्य समोर आलं.

५ जून २०२१ रोजी स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे पोलीस निरीक्षक अजय देसाईने(Ajay Desai) सकाळी सकाळी त्याच्या सासरी फोन केला. त्याने सांगितले की, रात्री माझं बायकोसोबत भांडण झालं सकाळी ती कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली. त्यामुळे मी चिंतेत आहे. त्यानंतर सासरची मंडळी तातडीनं देसाईच्या घरी पोहचली. तेव्हा अजय देसाई स्वत: कार घेऊन बायकोला शोधण्यासाठी जात असल्याचं सांगत घरातून बाहेर पडला.

अजय देसाईनं स्वीटीसोबत २०१६ मध्ये प्रेमविवाह केला होता. परंतु त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. परंतु कहानीमध्ये ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा घटस्फोटानंतरही अजय आणि स्वीटी लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. याच काळात  ४ आणि ५ जूनला स्वीटी आणि अजयमध्ये भांडण झालं. त्यानंतर स्वीटी गायब झाली तिचा काहीही थांगपत्ता लागला नाही. या दोघांना २ वर्षाचा मुलगाही आहे. अजय स्वत: पोलीस आहे त्यामुळे पत्नी स्वीटीला शोधण्याची जबाबदारी अजयनं घेतली. त्यानंतर सासरीची मंडळी २ वर्षाच्या मुलाला घेऊन त्यांच्या घरी गेली.

परंतु ५ जूनपासून स्वीटीचा शोध सुरू होता तो शेवटपर्यंत पोहचला ज्याचा विचारही कुणी केला नसेल. ५ जूनला स्वीटी बेपत्ता झाली त्यानंतर अजय तिचा शोध घेत होता. परंतु खूप प्रयत्नानंतरही तिचा ठावठिकाणा लागला नाही. स्वीटी बेपत्ता असल्यानं घरच्यांचंही टेन्शन वाढलं. अजय स्वत: स्वीटीचा शोध घेत होता परंतु त्याने बायको बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिलीच नव्हती. बरेच आठवडे झाले तरीही शोध लागत नव्हता. म्हणून स्वीटीचा भाऊ जयदीप पटेलने ११ जूनला करजन पोलीस ठाण्यात बहिण बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

स्वीटी बेपत्ता होण्यापूर्वी अजय आणि स्वीटीमध्ये भांडण झाल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे अजयची चौकशी होणारच होती. पोलिसांनी अजयचा तपास सुरू केला तेव्हा तो स्वीटीबाबत उडवाउडवीची उत्तरं देत होता. तर स्वीटीच्या घरच्यांनी अजयवर संशय व्यक्त करायला सुरुवात केली. पोलिसांनी ४ आणि ५ जून रोजी अजयनं त्याचा मित्र आणि काँग्रेस नेता किरीट सिंह जडेजाला फोन केला हा आणि दुसऱ्या दिवशी त्याची भेट घेतली. जडेजासोबत भेट का घेतली याचा शोध पोलिसांनी घेतला.

पोलीस करजनमध्ये असलेल्या जडेजाच्या त्या हॉटेलपर्यंत पोहचली जिथं अजयनं त्याची भेट घेतली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. १ जून ते १० जूनपर्यंत फुटेज तपासले परंतु ५ जून सकाळचे फुटेज डिलिट करण्यात आले होते. तेव्हा पोलिसांना आणखी संशय वाढला. त्यानंतर पोलिसांनी अजय देसाईसोबतच त्याचा मित्र किरिट सिंह जडेजावर पाळत ठेवली. क्राईम ब्रान्चनं अजय देसाईची पॉलीग्राफ टेस्ट घेतली यात काही संकेत मिळाले. मात्र अजय वारंवार बायकोच्या बेपत्ता होण्यामागे त्याला काहीच माहिती नाही असं दाखवत होता.

पोलिसांनी अजयच्या मोबाईल फोनचा तपास घेतला. तेव्हा ५ जूनला दुपारी अजय करजनपासून ५० किमी अंतरावर भरुच जिल्ह्यातील अटाली गावात होता. त्याठिकाणी तो २ तास थांबला. योगायोग म्हणजे याठिकाणी काँग्रेस किरीट जडेजाच्या एका हॉटेलचं बांधकाम सुरू आहे. त्यामुळे अटाली गावापर्यंत पोलीस पोहचले. त्याठिकाणी जडेजाचं हॉटेल होतं तेथे तपास सुरू केला. तेव्हा त्यांना काही खूणा आणि हाडे सापडली. त्यामुळे संशय आणखी बळावला. त्यानंतर एक पथक अजय देसाईच्या घरी पोहचलं तेव्हा त्यांना आणखी एक पुरावा सापडला. अजयच्या घरातील बाथरूममध्ये रक्ताचे डाग होते. ज्याच्या तपासातून अजयनेच बायकोची हत्या केल्याचं उघड झालं.

अजयनं का केला बायकोचा खून?

अजयनं त्याच्या बायकोची हत्या का केली हा प्रश्न पोलिसांना पडला होता. तेव्हा खुलासा झाला की, अजय देसाईनं स्वीटीसोबत २०१६ मध्ये लग्न केले होते. स्वीटीने याआधीच २ लग्न केली होती तिने घटस्फोटही घेतले होते. २०१५ मध्ये तिने अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या दुसऱ्या नवऱ्यासोबत घटस्फोट घेऊन भारतात परतली. भारतात आल्यानंतर तिची भेट अजय देसाईसोबत झाली. दोघांनी लग्न केले.

अजयचंही हे दुसरं लग्न होतं. त्याने पहिल्या लग्नानंतर बायकोला घटस्फोट दिला. स्वीटी आणि अजय २ वर्ष सुखाने नांदत होते. त्यांना २ वर्षाचा मुलगाही होता. परंतु अजयच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एन्ट्री झाली. त्यानंतर अजयनं स्वीटीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु घटस्फोट घेतल्यानंतरही दोघं लिव इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. तिसऱ्या पत्नीसोबत जवळीक वाढल्याने स्वीटीसोबत त्याची रोज भांडण होत होती. एकेदिवशी हे भांडण इतकं टोकाला पोहचलं की अजयने ४ जूनला स्वीटीची हत्या केली.

टॅग्स :Policeपोलिसcongressकाँग्रेस