शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अल्पवयीन मुलींच्या सुरक्षा विषयक गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने वादंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2021 16:33 IST

Goa CM Pramod Sawant : कोलवा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणामुळे गोवा हादरला होता आणि अशातच गोवा विधानसभा अधिवेशनात ह्या मुद्यावर विरोधक आक्रमक बनले आहेत.

ठळक मुद्दे राष्ट्रीय माध्यमांनीही मुख्य बातमी केल्यामुळे हा आता राष्ट्रीय मुद्दा बनला असून त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.  

पणजी - ‘अल्पवयीन मुलींना बाहेर पाठविताना त्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांनीही घेतली पाहिजे ’ असे वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केल्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय माध्यमांनीही मुख्य बातमी केल्यामुळे हा आता राष्ट्रीय मुद्दा बनला असून त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 कोलवा येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या गँगरेप प्रकरणामुळे गोवा हादरला होता आणि अशातच गोवाविधानसभा अधिवेशनात ह्या मुद्यावर विरोधक आक्रमक बनले आहेत. गुरूवारी पत्रकारांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना तपास कामाविषयी विचारले असता त्यांनी हे वक्त्व्य केले. ते म्हणाले की या प्रकरणातील सर्व ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच यात सामील असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबीतही करण्यात आले आहे. नंतर ते म्हणाले की या प्रकरणात पालकही जबाबदार आहेत. अल्पवयीन मुलींना बाहेर पाठविताना पालकांनीही जबाबदारी घेतली पाहिजे असे ते म्हणाले. गोव्यात गुन्हे वाढत असल्याचा दावा खोडून काढताना ते म्हणाले की गोव्यात गुन्ह्यांचा छडा लावला जात आहे की वस्तुस्थिती आहे. दरम्यान अल्पवयीन मुलींची जबाबदारी पालकांनी घ्यावी  हे त्यांचे वक्तव्य वादग्रस्त ठरले आहे. सोशल मिडियावरही त्याचे पडसाद उठत आहेत. हे पडसाद टीकात्मकही आहेत आणि समर्थनार्थही आहेत. 

पोलीस गस्त वाढविलीगोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिना यांनी या विषयी बोलताना सांगिले की या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून संशयितांची कसून चौकशी केली जाणार आहे. तसेच असे प्रकार टाळण्यासाठी अनेक ठिकाणी पोलीसांची गस्त वाढविण्यात आली आहेत असेही त्यांनी सांगितले

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवाSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळvidhan sabhaविधानसभा