शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

महिलांकडून कायद्याचा दुरुपयोग, ४९८ अ च्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता - सर्वोच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 7:13 AM

देशात वैवाहिक खटल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वैवाहिक संबंधांमध्ये सध्या पूर्वीपेक्षा जास्त तणाव व संघर्ष आहे, ही वस्तुस्थिती आहे

खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध वैयक्तिक बदला घेण्यासाठी ४९८ अ, आयपीसी वापरण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त करून वर मोघम आरोपांवर खटला चालवणे हा कायद्याच्या प्रक्रियेचा दुरुपयोग आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

तरन्नुम अख्तरने २०१७ रोजी मो. इकरामशी विवाह केला. एप्रिल १९ मध्ये तरन्नुम अख्तरने पती मोहम्मद इकराम, पुतणी, सासू, नणंद यांच्याविरुद्ध कलम ३२३ (मारहाण), ३४१ (घरात डांबून ठेवणे), ३७९ (चोरी), ३५४ (विनयभंग) आणि ४९८ अ (छळ) आयपीसीअंतर्गत एफआयआर दाखल केला. हे सर्व जण हुंडा म्हणून माहेरहून कार घेऊन येण्यासाठी तिच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप तिने केला. कार मिळाली नाही तर जबरदस्तीने गर्भपात करण्याची धमकी देत असल्याची तिची तक्रार होती.

एफआयआर रद्द करण्यासाठी पती आणि नातेवाईकांनी पाटणा उच्च न्यायालयात धाव घेतली, परंतु याचिका फेटाळण्यात आली. एफआयआरवरून गुन्हा दिसतो म्हणून पोलिसांनी तपास करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. मो. इकराम आणि नातेवाईकांनी सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले. तरन्नुमने आरोप केला आहे की, सर्व आरोपींनी तिचा मानसिक छळ केला आणि गर्भपात करण्याची धमकी दिली. मात्र आरोपीवर कोणत्याही विशिष्ट घटनेसह आरोप करण्यात आलेले नाहीत व केलेले आरोप मोघम आहेत, असे निरीक्षण नोंदवीत सर्वोच्च न्यायालयाने अपील मान्य करत गुन्हा रद्द केला.

अलीकडच्या काळात, देशात वैवाहिक खटल्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. वैवाहिक संबंधांमध्ये सध्या पूर्वीपेक्षा जास्त तणाव व संघर्ष आहे, ही वस्तुस्थिती आहे. पती आणि त्याच्या नातेवाईकांविरुद्ध वैयक्तिक मतभेदांचा बदला घेण्यासाठी ४९८ अ आयपीसीचा  साधन म्हणून वापरण्याची प्रवृत्ती वाढली आहे. गुन्हेगारी खटल्यातून पुढे निर्दोष मुक्तता झाली तरी, आरोपींच्या चारित्र्यावर कायम डाग लागतो म्हणुन अशा प्रवृत्तींना आळा घातला  पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच निकालात कलम ४९८अ आयपीसीचा दुरुपयोग आणि वैवाहिक वादात पतीच्या नातेवाईकांना अडकविण्याच्या वाढलेल्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. -न्यायाधीश एस. अब्दुल नझीर आणि कृष्णा मुरारी, सर्वोच्च न्यायालय

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय