शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लग्नाला जमली इतकी गर्दी की वधू-वराला भरावा लागला तब्बल ९ लाख ५० हजारांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 16:57 IST

छत्तीसगढच्या अम्बिकापूर शहरात एका लग्न सोहळ्याला १ हजाराहून अधिक जणांनी उपस्थिती लावून कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

छत्तीसगढच्या अम्बिकापूर शहरात एका लग्न सोहळ्याला १ हजाराहून अधिक जणांनी उपस्थिती लावून कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजीव कुमार यांच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनानं लग्न समारंभाचे आयोजक आणि वध-वर पक्षावर कारवाई केली असून कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याविरोधातील आजवरची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. 

जिल्हा प्रशासनानं लग्न समारंभाचं सभागृह सील करण्यासोबतच सभागृहाचे संचालक आणि वधू-वर पक्षावर एकूण ९ लाख ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अम्बिकापूर येथील चौरसिया मॅरेज गार्डन येथे २ जुलै रोजी एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला १ हजाराहून अधिक जण उपस्थित होते अशी माहिती संजीव कुमार यांना मिळाली. त्यानुसार संजीव कुमार यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीअंती लग्न सोहळ्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन केल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता विवाह सोहळ्यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीची परवानगी असतानाही तब्बल १ हजार माणसांना निमंत्रित केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. चौरसिया मॅरेज गार्डनचे संचालक विरेंद्र चौरसिया यांना ४ लाख ७५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

यासोबतच विवाह सोहळ्यातील वराचे वडील सरोज साहू यांना २ लाख ३७ हजार रुपयांचा, तर वधूचे वडील प्रकाश साहू यांनाही २ लाख ३७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गत विवाह सोहळ्यांवरही आता प्रशासनानं करडी नजर ठेवण्या सुरुवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत असतानाच नागरिकांमध्ये बेजबाबदारपणा वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे. बाजारासह सार्वजनिक ठिकाणी लोक मास्क न वापरणं, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणं अशाप्रकारे नियमांचं उल्लंघन करत असल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcorona virusकोरोना वायरस बातम्या