शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

रासायनिक कचऱ्याचा साठा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:32 PM

कोळगाव ग्रामस्थांनी पकडला साठा : रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकऱ्यांना आजार

पालघर : कोळगावच्या जेनेसिस औद्योगिक वसाहतीमधील फेज नंबर ३ येथील एका गोडाऊनमधील सहा खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने जैविक टाकाऊ रासायनिक कचºयाचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. सोमवारी ग्रामस्थांनी हा साठा पकडून तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.

जेनेसिस इंडस्ट्रीमध्ये गाळ्यात जैविक टाकाऊ रसायनांचा साठा अवैधरित्या साठवून ठेवला होता. त्या रसायनांच्या प्रादुर्भावामुळे गावकºयांना उलट्या होणे, चक्कर, मळमळणे अशा आजारांनी ग्रासले होते. या दुर्गंधीचा शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ अनेक दिवसांपासून करत होते. परंतु शोध लागत नव्हता. सोमवारी ग्रामस्थांनी या अवैधरित्या साठवून ठेवलेल्या रसायनाचा शोध घेतला. दीड महिन्यांपासून या गोदामातून जैविक रसायनाची विल्हेवाट लावण्याचा प्रकार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ग्रामस्थांना या ठिकाणी रासायनिक द्रव्य भरलेले ३५० ड्रम, शेकडो गोण्या भरलेला कचरा आदी मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा आढळून आला. मालकाला ही बाब कळताच त्यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास येथे असलेला हा घातक कचरा ट्रकच्या सहाय्याने दुसरीकडे हलवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र त्याचवेळी कोळगाव गावाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत हे रोखले. यावेळी ट्रक चालक आणि तेथे काम करणारे मजूर हे लागलीच पळून गेले. येथे उपस्थित कंपनीचा सुपरवायझर राकेश रॉय हा ग्रामस्थांच्या हाती लागला. राकेश रॉयला पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर अजगर अली नामक व्यक्ती याचा सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या सूत्रधाराला पकडल्यास आपल्या कारखान्यातील टाकाऊ जैविक कचरा देणाºया कारखानदारांचे बिंग फुटून या टोळीचा पर्दाफाश होऊ शकतो. तारापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी राजेश नांदगावकर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून रसायनांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या रसायनांमुळे जिल्ह्यात प्रदूषणाची मात्रा वाढत जाऊन भूगर्भातील पाणीसाठे प्रदूषित झाले आहेत.लोकांच्या जीवाशी खेळएमआयडीसी तारापूर आणि पालघरमधील काही कारखानदार आपल्या कंपनीतील टाकाऊ जैविक तसेच रासायनिक कचरा नवी मुंबईच्या वेस्ट मॅनेजमेंटमध्ये पाठविण्यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च वाचवण्यासाठी कचºयाची विल्हेवाट लावणाºया टोळ्यांकडे तो सोपवतात. पैशासाठी लोकांच्या आणि पर्यावरणाच्या जीवाशी हे लोक खेळत आहेत. या टोळ्यांकडे हा कचरा सोपविल्यानंतर तो एखाद्या रस्त्याच्या निर्जन स्थळी अथवा नदी, नाले, शेतात फेकला जातो.