शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सात फेरे घेऊन तिने 18 जणांना घातला गंडा, लुटारू नवरीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 10:38 IST

विवाहेच्छुक तरुणांशी विवाहगाठ बांधून त्यांना गंडा घालणारी तरुणी आणि तिच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

लखनौ - विवाहेच्छुक तरुणांशी विवाहगाठ बांधून त्यांना गंडा घालणारी तरुणी आणि तिच्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. छत्तीसगडमधील या टोळीची प्रमुख असलेली एक तरुणी तिचा कथित पती, एक साध्वी आणि अन्य दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लग्न झाल्यानंतर बलात्कार, अपहरण आणि जबरदस्तीने विवाह केल्याची तक्रार करण्याची धमकी देऊन ही टोळी तरुणांना लुबाडत असे, असा या टोळीवर आरोप आहे. या टोळीची प्रमुख असलेल्या निर्मला ठाकूर हिने उत्तर प्रदेशातील बांदा येथील घनश्याम नावात्या तरुणासोबत 10 जुलै रोजी विवाह केला होता. या विवाहाच्या बदल्यात साध्वी मालती शुक्ला, ममता द्विवेदी आणि तिचा पती निरंजन द्विवेदी याने 50 हजार रुपये उकळले. या विवाहाला तीन दिवस उलटल्यानंतर निर्मलाचा कथित पती कुलदीप हा घनश्यामच्या घरी पोहोचला. तसेच निर्मलाचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याचा आरोप त्याने घनश्यामवर केला. तसेच दोन लाख रुपये न दिल्यास पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली.  पण घनश्यामने पैसे देण्यास नकार दिल्यावर कुलदीपने घनश्याम आणि त्याच्या भावाविरोधात अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी घनश्याम आणि त्याच्या भावाला अटक केली. ही बातमी पसरताच बांदा येथे राहणारे दिनेश पांडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तसेच गेल्या महिन्यात मालती शुक्ला हिने एक लाख रुपये घेऊन त्यांचा विवाह निर्मला गिच्याशी करून दिल्याचे तसेच काही दिवसांनंतर निर्मला लाखो रुपयांचे दागिने घेऊन पसार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी निर्मला आणि तिच्या साथीदारांची उलट तपासणी घेतली असता त्यांनी आपण 18 तरुणांना गंडा घातल्याचे कबूल केले.   

टॅग्स :Crimeगुन्हाmarriageलग्नWomenमहिला