शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बनावट गुणपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 16:20 IST

त्यावेळी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन हे तिघे गुणपत्रिका काढताना आढळून आले. न्यायालयाने तिन्ही अारोपींना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस. याप्रकरणी इतरही आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या अनुषंगाने अधिक तपास करत आहेत.

मुंबई - मुंबई विद्यापीठातील भोंगळ कारभाराचं अजून एक प्रकरण आता उघडकीस आलं आहे. मुंबई विद्यापीठात बनावट गुणपत्रिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांना पास करणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन या विद्यापीठाच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक केली अाहे. मुंबई विद्यापीठ कलिना येथील गरवारे इन्स्टिट्यूटमध्ये हा प्रकार उघडकिस आला आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता असून पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती बीकेसी पोलिसांनी दिली. 

मुंबई विद्यापीठात पेपर घोटाळ्यानंतर आता बनावट गुणपत्रिकांचे प्रकरण उघडकीस आल्याने विद्यापीठाचा भोंगळ कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मुंबई विद्यापिठाच्याअंतर्गत गरवारे इन्स्टिट्यूट मास्टर ऑफ सबस्टॅन्शिअल डेव्हलपमेंट या परीक्षेच्या उत्तरपत्रिकेत फेरफार करून बनवट गुुुुणपत्रिकेद्वारे विद्यार्थ्यांना उतीर्ण केले जात होते. याबाबत विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी बीकेसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुणपत्रिका ठेवलेल्या ठिकाणचे सीसीटिव्ही तपासले. त्यावेळी संदीप संतोष पालकर, संगमेश प्रकाश कांबळे आणि सय्यद नदीम अहमद निजामुद्दीन हे तिघे गुणपत्रिका काढताना आढळून आले. न्यायालयाने तिन्ही अारोपींना १९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस. याप्रकरणी इतरही आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय असून पोलीस त्या अनुषंगाने अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीexamपरीक्षाuniversityविद्यापीठ