शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

गावी गेल्याची संधी साधून भाईंदरमध्ये घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 16:16 IST

भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगरमधील एक कुटुंब आईच्या अंत्यविधीसाठी गावी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घरफोड्याने टाळे तोडून साडेचार लाखांचा ऐवज चोरून नेला. 

पूर्वेच्या व्यंकटेश्वर नगर इमारत क्र . ६ मध्ये राहणारे दत्ता मुळजे त्यांच्या आई मंगलबाई यांच्या अकस्मात निधनामुळे अंत्यविधीसाठी कुटुंबासह कर्नाटक येथील मूळ गावी गेले होते. दत्ता यांचा लहान भाऊ श्रीकांत हा २७ ऑक्टोबर रोजी भाईंदर येथे आला असता दत्ता यांच्या घराचे लॉक कापलेले व आतील कडी तोडलेली असल्याचे आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडले असल्याचे आढळून आले . 

घरातील ३ लाख किमतीचे ६ तोळे वजनाचे मंगळसुत्र,अंगठी, लॉकेट, कानातले  झुमके असे दागिने व दिड ल;लाख रुपये रोख आणि ५ हजाराचा कॅमेरा असा ४ लाख ५५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्या प्रकरणी दत्ता यांनी भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात गुरुवारी दिलेल्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गावी वा बाहेगावी जाताना नागरिकांनी आपल्या घराची सुरक्षितता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना व सूचनांचे पालन करावे तसेच शेजाऱ्यांनी देखील आपल्या आजूबाजूच्या बंद घरांवर लक्ष ठेवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी