शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सासरच्यांना बेशुद्ध करून फरार झाली नवरी, पोलिसांनी पकडल्यावर समजलं ती तर आहे पाच मुलांची आई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:43 IST

crime News: उदयपूरवाटी भागामध्ये दहा दिवसांपूर्वी बिहारमधून लग्न करून आणलेल्या एका नववधूने रचलेले धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. या नववधूने पतीसह सासरच्या मंडळीला बेशुद्ध करून घरातून पसार झाली.

जयपूर - उदयपूरवाटी भागामध्ये दहा दिवसांपूर्वी बिहारमधून लग्न करून आणलेल्या एका नववधूने रचलेले धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. या नववधूने पतीसह सासरच्या मंडळीला बेशुद्ध करून घरातून पसार झाली. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ती तिच्या दोन सहकाऱ्यांसाठी पकडली गेली. या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीमध्ये ही महिला पाच मुलांची आई असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र पीडित कुटुंबाने या संदर्भात कुठलीही तक्रार दिलेली नाही. मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार उदयपूरवाटीच्या भाटावाला येथे वास्तव्यास असलेल्या मुकेश सैनी याचे लग्न ठरत नव्हते. त्यामुळे त्याच्या मोठ्या भावाच्या नातेवाईकांनी त्याला बिहारमधून एक स्थळ आणले. त्यानंतर छपरा जिल्ह्यातील एका गावात ते पोहोचले तिथे अनिता नावाच्या तरुणीच्या नातेवाईकांकडून मुकेश कडून दोन वेळा प्रत्येकी दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर लग्न करून अनिताची मुकेशसोबत पाठवणी केली.

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा मुकेश आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य बेशुद्धावस्थेत घरात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घरच्यांना बेशुद्ध करून पसार झालेल्या नववधूचा पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा ही महिला पेट्रोलपंपजवळ सापडली. चौकशीमध्ये ही २५ वर्षीय महिला कधी तिचं नाव कविता, तर कधी अनिता असल्याचे सांगत होती. लग्न करण्यासाठी विकत घेऊन तिला दहा दिवसांपूर्वी इथे आणल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पती व्यसनी असल्याने तसेच मारहाण करत असल्याने घरातून पळ काढल्याचा दावा तिने केला. दरम्यान, पीडित कुटुंबाने याबाबत अद्याप तक्रार दिलेली नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न