शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

सासरच्यांना बेशुद्ध करून फरार झाली नवरी, पोलिसांनी पकडल्यावर समजलं ती तर आहे पाच मुलांची आई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 13:43 IST

crime News: उदयपूरवाटी भागामध्ये दहा दिवसांपूर्वी बिहारमधून लग्न करून आणलेल्या एका नववधूने रचलेले धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. या नववधूने पतीसह सासरच्या मंडळीला बेशुद्ध करून घरातून पसार झाली.

जयपूर - उदयपूरवाटी भागामध्ये दहा दिवसांपूर्वी बिहारमधून लग्न करून आणलेल्या एका नववधूने रचलेले धक्कादायक कारस्थान उघडकीस आले आहे. या नववधूने पतीसह सासरच्या मंडळीला बेशुद्ध करून घरातून पसार झाली. मात्र शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ती तिच्या दोन सहकाऱ्यांसाठी पकडली गेली. या तिघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीमध्ये ही महिला पाच मुलांची आई असल्याचे उघडकीस आले आहे. मात्र पीडित कुटुंबाने या संदर्भात कुठलीही तक्रार दिलेली नाही. मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार उदयपूरवाटीच्या भाटावाला येथे वास्तव्यास असलेल्या मुकेश सैनी याचे लग्न ठरत नव्हते. त्यामुळे त्याच्या मोठ्या भावाच्या नातेवाईकांनी त्याला बिहारमधून एक स्थळ आणले. त्यानंतर छपरा जिल्ह्यातील एका गावात ते पोहोचले तिथे अनिता नावाच्या तरुणीच्या नातेवाईकांकडून मुकेश कडून दोन वेळा प्रत्येकी दीड लाख रुपये घेतले. त्यानंतर लग्न करून अनिताची मुकेशसोबत पाठवणी केली.

दरम्यान, रविवारी रात्री उशिरा मुकेश आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य बेशुद्धावस्थेत घरात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रकृती गंभीर असल्याने सर्वांना जयपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घरच्यांना बेशुद्ध करून पसार झालेल्या नववधूचा पोलिसांनी शोध सुरू केला तेव्हा ही महिला पेट्रोलपंपजवळ सापडली. चौकशीमध्ये ही २५ वर्षीय महिला कधी तिचं नाव कविता, तर कधी अनिता असल्याचे सांगत होती. लग्न करण्यासाठी विकत घेऊन तिला दहा दिवसांपूर्वी इथे आणल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पती व्यसनी असल्याने तसेच मारहाण करत असल्याने घरातून पळ काढल्याचा दावा तिने केला. दरम्यान, पीडित कुटुंबाने याबाबत अद्याप तक्रार दिलेली नाही.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न