शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

अर्णब गोस्वामी यांच्या गाडीवर शाई फेेेकली, अंगरक्षकांंनी दोघांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 16:32 IST

गोस्वामींच्या अंगरक्षकांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देकाल रात्री 12.20 वाजताच्या दरम्यान गोस्वामी अंगरक्षकासह पत्नीसोबत स्टुडिओतून घराकडे जात असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी गाडी अडवली.याप्रकरणी ना.म.जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई - रिपल्बिक टीव्ही या वृत्तवाहिनीचे मुख्य  संंपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघर हत्याकांडाच्या घटनेबाबत न्यूज चॅनेलवर जे वार्तांकन केले. त्यावरुन सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला आहे. पालघर मॉब लिंचींगमध्ये 2 हिंदू साधूंची आणि वाहन चालकाची हत्या करण्यात आली. त्यावरुन ८० टक्के हिंदू असलेल्या भारत देशात हिंदू साधूंची हत्या होते, असे म्हणत अर्णब यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अनेक नेटीझन्सने त्यांच्यावर केला आहे. कदाचित, याच घटेवरुन पत्रकार गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काल रात्री 12.20 वाजताच्या दरम्यान गोस्वामी अंगरक्षकासह पत्नीसोबत स्टुडिओतून घराकडे जात असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी गाडी अडवली. गाडीच्या काचेवर हाताने थापा मारून गाडीवर बाटलीतून आणलेली शाई टाकली. नंतर गोस्वामींच्या अंगरक्षकांनी त्या दोघांना ताब्यात घेतले. 

मुंबईत पत्रकार अर्णब गोस्वामींच्या गाडीवर हल्ला, पोलिसात तक्रार दाखल

याप्रकरणी ना.म.जोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना पोलिसांनीअटक केली आहे. भा. दं. वि. कलम 341, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र मीडिया पर्सन्स अँड मीडिया इन्स्टिट्यूशन ऍक्ट 2017 कलम 3, 4 चा देखील समावेश करण्यात आला आहे. अर्णब यांनी आपल्या चॅनलवर या संदर्भात वार्तांकन करताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरही सडकून टीका केली होती. ईटलीवाली सोनियाजी... असा त्यांचा वारंवार उल्लेख केल्याने काँग्रेस नेत्यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई