शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 18:22 IST

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि...

बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका जोडप्याने छोट्याशा वादानंतर खोल पाण्यात उडली घेतली. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला तर तरूणीला बचाव दलाने वाचवलं. जीव वाचलेल्या तरूणीने मृत आपला पती असल्याचं सांगितलं. तर आत्महत्येचं कारण पती-पत्नीत सुरू असलेला वाद सांगण्यात येत आहे.

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि बघता बघता दोघांनी पुलावरून खाली खोल पाण्यात उडी घेतली. जवळच असलेल्या मासेमारी करणाऱ्यांनी दोघांनाही पाण्यात उडी घेताना पाहिलं आणि त्यांना वाचवण्यासाठी धावून आले. मात्र, तरूणाचा मृत्यू झाला. तर तरूणीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. (हे पण वाचा : बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना)

मृतक तरूण वैशाली जिल्ह्यातील हसनपूर जुनैद गावात राहणारा अविनाश कुमार पटेल आहे. तर तरूणी हरैल गावात राहणारी सोनाक्षी कुमारी आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, दोघांमध्ये काही कारणावरून वाद पेटला होता. यादरम्यान ते कुणासोबत तरी व्हिडीओ कॉलवर बोलत होते आणि शिव्याही देत होते. अशात अचानक दोघांनी पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली. स्थानिकांनी घटनेची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. 

दरम्यान, परिसरात चर्चा सुरू आहे की, मृत तरूणाचं आधी एका तरूणीसोबत लग्न झालं होतं आणि हरैल गावात राहणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून बाइक ताब्यात घेतली. पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी