शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
3
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
4
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
5
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
6
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
7
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
8
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
9
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
10
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
11
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
12
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
13
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
14
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
15
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
16
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
17
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
18
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

रस्त्यात झालं पती-पत्नीचं भांडण तर बाइक थांबवून दोघांनी पुलावरून घेतली उडी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 18:22 IST

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि...

बिहारच्या समस्तीपूरमध्ये एका जोडप्याने छोट्याशा वादानंतर खोल पाण्यात उडली घेतली. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाला तर तरूणीला बचाव दलाने वाचवलं. जीव वाचलेल्या तरूणीने मृत आपला पती असल्याचं सांगितलं. तर आत्महत्येचं कारण पती-पत्नीत सुरू असलेला वाद सांगण्यात येत आहे.

दोघेही बाइकवरून चकसाहू रोडवरील कलकलियां पुलावरून जात होते. यावेळी जोडप्यात काही कारणावरून भांडण झालं आणि बघता बघता दोघांनी पुलावरून खाली खोल पाण्यात उडी घेतली. जवळच असलेल्या मासेमारी करणाऱ्यांनी दोघांनाही पाण्यात उडी घेताना पाहिलं आणि त्यांना वाचवण्यासाठी धावून आले. मात्र, तरूणाचा मृत्यू झाला. तर तरूणीचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं. (हे पण वाचा : बोबड्या भाषेत ६ वर्षीय मुलीने उलगडलं आईच्या हत्येचं रहस्य, डोळ्यांनी पाहिली होती तिने सगळी घटना)

मृतक तरूण वैशाली जिल्ह्यातील हसनपूर जुनैद गावात राहणारा अविनाश कुमार पटेल आहे. तर तरूणी हरैल गावात राहणारी सोनाक्षी कुमारी आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, दोघांमध्ये काही कारणावरून वाद पेटला होता. यादरम्यान ते कुणासोबत तरी व्हिडीओ कॉलवर बोलत होते आणि शिव्याही देत होते. अशात अचानक दोघांनी पुलावरून खाली पाण्यात उडी घेतली. स्थानिकांनी घटनेची सूचना पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. 

दरम्यान, परिसरात चर्चा सुरू आहे की, मृत तरूणाचं आधी एका तरूणीसोबत लग्न झालं होतं आणि हरैल गावात राहणाऱ्या तरूणीसोबत त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. यावरूनच त्यांच्यात वाद सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून बाइक ताब्यात घेतली. पोलिसांनी सांगितलं की, प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी