शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

धक्कादायक! भर दिवसा ग्रामस्थांनी चक्क 300 बकऱ्या चोरल्या अन्...: नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:59 IST

ग्रामस्थ मोठ्या संख्येने ट्रकजवळ पोहोचले. अनेक जण बकऱ्या घेऊन पळाले.

बिहारच्या अरवलमध्ये भर दिवसा बकऱ्या पळवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 139 वर उमैराबादजवळ ट्रक थांबला असताना ग्रामस्थांनी ट्रकमधून बकऱ्या पळवून नेल्या. ग्रामस्थांनी जवळपास 300 बकऱ्या चोरल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाटणा-औरंगाबाद मुख्य मार्गावरून ट्रक कोलकात्याला जात होता. 

रस्त्यात थांबवून ग्रामस्थांनी बकऱ्या उतरवण्यास सुरुवात केली. ग्रामस्थ मोठ्या संख्येने ट्रकजवळ पोहोचले. अनेक जण बकऱ्या घेऊन पळाले. कोणी दुचाकीवरून येत, तर कोणी पायी येऊन बकऱ्या पळवून नेल्या. ट्रकमधून नेमक्या किती बकऱ्या चोरीला गेल्या याचा नेमका आकडा समोर आलेला नाही. बकऱ्यांची मोजदाद झाल्यावरच चोरीला गेलेल्या बकऱ्यांची नेमकी संख्या समजू शकेल. 

जवळपास 300 बकऱ्या पळवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाची आपल्याला कोणतीच माहिती नसल्याचं पोलीस ठाण्याचे प्रभारी शंभू पासवान यांनी सांगितलं.बकऱ्यांनी भरलेला ट्रक कोलकात्याच्या दिशेनं जात होता. ग्रामस्थ बकऱ्या पळवून नेत असल्याचं पाहून चालकाने ट्रक सुरू केला आणि तिथून निघाला. या घटनेमुळे उमैराबादमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. 

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले. मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी बकऱ्या पळवल्या होत्या. या प्रकरणी पोलीस स्थानिकांकडून माहिती घेत आहेत. अद्याप कोणीही या घटनेची तक्रार पोलिसांकडे केलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार