शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत असताना दोन्ही मुलांचा कापला गळा; विष पिऊन आईवडिलांचा आत्महत्येचा प्रयत्न, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:34 IST

मिसरोद ठाण्याच्या हद्दीत रवी ठाकरे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मागील काही काळापासून रवी ठाकरे यांची नोकरी गेल्याने ते चिंतेत होते.

ठळक मुद्देरवीने सुरुवातीला मुलगा चिराग आणि मुलगी गुंजन यांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. ठाकरे कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं माहिती मिळताच पोलिसांना कळवलं.घटनास्थळी विषाची बाटली आणि रक्तानं माखलेला कटरही पडला होता.

भोपाळ – मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका कुटुंबात एक ह्दयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका पित्यानं १६ वर्षीय मुलगा आणि १४ वर्षीय मुलीचा टाइल्स कटरनं गळा चिरला. त्यानंतर आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. बेरोजगारी आणि आर्थिक तंगीमुळे त्रस्त होऊन या दाम्पत्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. परंतु या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेत मुलगा आणि पती दोघांचे निधन झाले तर मुलगी, पत्नीवर उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती सिविल इंजिनिअर हा खूप दिवसांपासून बेरोजगार होता. आर्थिक समस्येमुळे त्रस्त होऊन त्याने धक्कादायक निर्णय घेतला. रवी ठाकरे हे कुटुंबासह १०२ मल्टी सहारा परिसरात राहत होते. कुटुंबात पत्नी रंजना ठाकरे, मुलगा चिराग ठाकरे आणि मुलगी गुंजन ठाकरे यांचा समावेश आहे. शनिवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घरातील कुठलाही सदस्य उठला नाही म्हणून शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर ते हैराण झाले. त्यांनी या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.

तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले त्यांनी चौघांना हॉस्पिटलला नेलं. ज्याठिकाणी डॉक्टरांनी रवी आणि त्यांचा मुलगा चिरागला मृत घोषित केले. तर पत्नी रंजना, मुलगी गुंजन यांच्यावर उपचार सुरु आहेत. रंजनाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने आम्ही हे टोकाचं पाऊल उचललं. रात्री २ च्या सुमारास मुलं झोपलेली असताना टाइल्स कटरनं पती रवी यांनी चिरागचा गळा कापला. त्यानंतर दोघा दाम्पत्याने मुलीचा गळाही कापण्याचा प्रयत्न केला तितक्यात मध्येच कटर बंद पडलं. त्यानंतर दोघांनी विष प्राशन केले. घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटनुसार आर्थिक तंगीनं आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजेश भदौरिया म्हणाले की, मिसरोद ठाण्याच्या हद्दीत रवी ठाकरे त्यांची पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मागील काही काळापासून रवी ठाकरे यांची नोकरी गेल्याने ते चिंतेत होते. तर त्यांची पत्नी रंजना यांच्यावर मानसिक तणाव होता. पत्नी ब्यूटी प्रोडक्ट्स विकण्याचं काम करत होती. पंरतु काही काळाने ते बंद पडलं. कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळत चालली होती. घरगुती वाद वाढले. त्यामुळे रवीने सुरुवातीला मुलगा चिराग आणि मुलगी गुंजन यांचा गळा कापण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत: आणि पत्नी रंजना यांनी विष घेतलं. त्यानंतर ठाकरे कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीनं माहिती मिळताच पोलिसांना कळवलं. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा संपूर्ण कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळलं. घटनास्थळी विषाची बाटली आणि रक्तानं माखलेला कटरही पडला होता.

टॅग्स :Policeपोलिस