शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

अंधश्रद्धेतून दीड महिना सुरू होती मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 06:05 IST

कल्याणमधील मायलेकाचं मृत्यूप्रकरण : जीवदानी, दत्त अंगात आलेल्याकडून घडले हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कविता तरे (२७) हिच्या अंगात जीवदानीदेवी, विनायक तरे (२२) याच्या अंगात काळभैरव आणि एका अल्पवयीन मुलाच्या अंगात दत्त आल्यावर ते गेला दीड महिना पंढरीनाथ शिवराम तरे (५०) आणि चंदूबाई शिवराम तरे (७६) या मायलेकाच्या अंगातील भूत उतरवण्याकरिता त्यांना अंगावर हळद टाकून मारहाण करीत होते आणि आजूबाजूचे कुणीही त्यांना या मारहाणीतून वाचविण्याकरिता ना पोलिसांकडे गेले ना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडे गेले. सुशिक्षित मध्यमवर्गीयांच्या शहरातील घोर अंधश्रद्धेतून घडलेल्या हत्याकांडाची ही लाजिरवाणी कहाणी आता उघड झाली आहे.

पोलिसांच्या ताब्यात असलेले तिघे आरोपी अजून आपण काळभैरव, दत्त आणि जीवदानीदेवी असल्याचे समजत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अजूनही हे तिघे जण आपण देवांचे अवतार असल्याच्या भ्रमात आहेत. आपण ज्यांना बेदम मारले, ते त्यांच्या शरीरातील भूत निघून गेल्याने निपचित पडले असून कधीही उठून उभे राहतील, अशी भाकडकथा चौकशीत पोलिसांना सांगत आहेत. अंगातील भूत तंत्रमंत्र करून बाहेर निघेल, या अंधश्रद्धेपोटी अंगावर हळद टाकून काठीने केलेल्या मारहाणीत मायलेकाचा मृत्यू झाल्याची घटना येथील पश्चिमेकडील अटाळीत शनिवारी घडली. या घटनेने समाजातील संवेदनशील व्यक्ती व पोलीस यांना धक्का बसला.

या प्रकरणी पंढरीनाथच्या अल्पवयीन मुलासह विनायक तरे, कविता तरे यांच्यासह मांत्रिक सुरेंद्र पाटील याला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. पंढरीनाथ यांची पुतणी कविता कैलास तरे हिच्या अंगात दैवी शक्तीचा संचार असल्याने पंढरीनाथ यांची पत्नी रेश्मा आणि दुसरी पुतणी संगीता ही कविताला अटाळी गावात राहणाऱ्या सुरेंद्र पाटील या मांत्रिकाकडे तंत्रमंत्र उपचारासाठी घेऊन जात असत. मांत्रिक पाटील याने त्यांना पंढरीनाथ आणि त्यांची आई चंदूबाई या दोघांच्या अंगात भूत आहे व त्यांच्या अंगातील भूत तंत्रमंत्र करून बाहेर काढावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर, कविताच्या अंगात जीवदानीदेवी, विनायकच्या अंगात काळभैरव आणि घरातील एका अल्पवयीन मुलाच्या अंगात दत्त संचारले. या तिघांनी मायलेकाची हत्या केल्याने सध्या कोठडीची हवा खात आहेत. त्या तिघांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार करीत आहेत.च्पोलिसांच्या चौकशीतही हे तिघे आपण देव असल्याचे ठामपणे सांगत असून पंढरीनाथ आणि चंदूबाई यांची हत्या झालेली नसून त्यांच्या अंगातील भूत मारहाणीमुळे पळून गेल्याचे ते सांगत आहेत. वरकरणी हे प्रकरण अंधश्रद्धेचे भासविले जात असले, तरी प्रत्यक्षात मालमत्तेच्या वादातून तर घडलेले नाही ना, असे पोलिसांना विचारले असता ते म्हणाले, तरे यांच्या घरात एकत्र कुटुंबपद्धती असून आर्थिक परिस्थिती फार चांगली किंवा खूप हलाखीची नाही.च्एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दुहेरी हत्याकांड कोणत्या आर्थिक वादातून घडले ते आतापर्यंतच्या तपासातून उघड झालेले नाही. ज्यांच्या बेदम मारहाणीत दोघांचा मृत्यू झाला, त्या तिघांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले आहे. त्यामुळे हे तिघे इतके पराकोटीचे अंधश्रद्धाळू असण्याइतके अल्पशिक्षित नाहीत. आतापर्यंत अंधश्रद्धेच्या घडलेल्या घटनांमध्ये मांत्रिकाने स्वत:च्या आर्थिक लोभापायी भक्तांना आमिष दाखवून फसविल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणात तसे काही दिसून येत नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे.

टॅग्स :Policeपोलिस