शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

पाचशे मुलींची तस्करी करणारा बांग्लादेशी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 21:20 IST

सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून तसेच तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते एजंट सैदुलकडे आणायचे.

वसई - बांग्लादेशातून अल्पवयीन मुली आणि तरूणांनी फसवणू वेश्याव्यवसायासाठी भारतात आणणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अखेर वसईच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीने मागील वर्षभरात किमाना पाचशे मुलींची तस्करी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील ११ आरोपी अद्याप फरार आहेत.

मागील वर्षी पोलिासांनी वेश्याव्यवसायावर छापा टाकून चार मुलींची सुटका केली होती. या चार मुली बांग्लादेशी होत्या आणि त्यांना फसवून या व्यवसायात आणण्यात आले होते. तेव्हापासून मुलींना फसवून आणणाऱ्या टोळीचा पोलीस शोध घेत होती. मात्र, टोळीचा म्होरक्या सैदुल (वय ४०) पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता. तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. अखेर पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वसई कक्षाचे प्रमुख जितेंद्र वनकोटी, हितेंद्र विचारे यांच्या पथकाने सैदुलला अटक केली. सैदुल हा बांग्लादेशी नागरिक आहे. बांग्लादेशातल्या गरीब मुलींना भारतात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांना तो बेकायदेशीरपणे भारतात आणत असे आणि विविध ठिकाणी कुंटणखान्यात शरीर विक्री करण्यासाठी विकत असे.

सैदुलने बांग्लादेशात आपले एजंट नेमले होते. ते तेथील गरीब मुलींना नोकरीचे आमिष दाखवून तसेच तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते एजंट सैदुलकडे आणायचे. तो त्यांना भारत बांग्लादेशाच्या सिमेवरून चोरट्या मार्गाने भारतात आणायचा आणि देशाच्या विविध भागात विकायचा. अल्पवयीन मुलगी असेल तर किमान १ लाख रुपये आणि इतर तरुणांनी ५० ते ६० हजारात विकायचा. यानंतरही दरमहिन्याला त्याला कुंटणखान्यातून या मुलींच्या मोबदल्यात ठराविक रक्कम मिळत असे. वसईत त्याच्याविरोधात ४ गुन्हे दाखल असून मुंबई, पुणे आदी ठिकाणी त्यांने मुली पुरविल्याचे पोलिसांना सांगितले. मागील वर्षभरात त्याने किमान ५०० मुलींना भारतात आणून विकले होते. या मुलींना शरीर विक्री करण्यास भाग पाडून कुंटणखान्यातून त्यांना दरमहा ५ हजार रुपये मिळायचे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक