शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या कथेत महिलांचं हरपलं भान; 22 गोल्डचेनची चोरी, 12 बाईक गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 16:33 IST

गर्दीचा फायदा घेत चोरटेही चांगलेच सक्रिय झाले होते. त्यांनी 22 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या.

बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या श्रीमद्भागवत कथेचा विदिशा येथे 13 एप्रिल रोजी समारोप झाला. 7 दिवसांच्या या कथेला एवढी गर्दी होती की कुठेही पाऊल ठेवायला जागा नव्हती. या गर्दीचा फायदा घेत चोरटेही चांगलेच सक्रिय झाले होते. त्यांनी 22 महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या. एवढेच नाही तर पार्किंगमध्ये लावलेल्या 12 बाईकही गायब झाल्या आहेत. विशेष म्हणजे येथून महिलांच्या पर्स आणि मोबाईलही चोरीला गेले आहेत. पण, किती चोरीच्या घटना घडल्या याची माहितीही पोलिसांकडे नाही

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेसाठी एवढी गर्दी होती की अनेक जण नातेवाईकांपासून दुरावले. काही वेळासाठी हरवले आणि नंतर सापडले. एका आकडेवारीनुसार, या कथेदरम्यान 50 हून अधिक लोकांना त्यांच्या नातेवाईकांकडून लांब गेले होते, सर्वसामान्यांपासून ते व्हीआयपी लोक सहभागी झाले होते. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशिवाय खासदार रमाकांत भार्गव, विदिशा प्रभारी मंत्री विश्वास सारंग, सिद्धीच्या खासदार रिता पाठक, खासदार प्रज्ञा ठाकूर, अक्षय ऊर्जा मंत्री हरदीप सिंह डंग, आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी, भोपाळच्या महापौर मालती राय आणि माजी मंत्री रामपाल सिंह. राजपूत आदींसह बडे नेते धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कथेत सामील झाले.

तुमचे जीवन प्रचारमय नाही तर विचारमय बनवा. अनेक लोक खोटे जीवन जगत आहेत असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी जनतेला एक आवाहनही केले. माझ्या नावाने कोणाला काही देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. देव फक्त प्रेमाचा भुकेला आहे. तो भक्ताची भक्ती पाहतो. विदिशा येथील कथेनंतर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, बागेश्वर धाममध्ये खूप गर्दी असते. त्यामुळेच आता दरबार धामपासून तीन ते चार किमी अंतरावर होणार आहे. 

पंडित धीरेंद्र यांनीही सिव्हिल लाइन्स रोडवर असलेल्या सभागृहात जनतेला संबोधित केले. यावेळी लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले. कथेच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी जमली होती. सर्वत्र वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कथा सुरू होण्यापूर्वीच लोक पोहोचले. विदिशाशिवाय बाहेरूनही शेकडो लोक इथे आले होते. 13 एप्रिलपर्यंत चाललेल्या श्रीमद भागवत कथेची सुरुवात 6 एप्रिल रोजी कलश यात्रेने झाली होती. यामध्ये पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत लोकांनी आपले मन अध्यात्मात वाहून घेतले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम