शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

12वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याच्या बीए पास पत्नीने केली आत्महत्या, 5 महिन्यांआधीच झालं होतं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 12:14 IST

Rajasthan : महिला रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. तीन दिवसांनी परत आल्यावर तिने आत्महत्या केली. सूनेचा मृतदेह लटकलेला पाहून सासरच्या लोकांना चांगला धक्का बसला.

राजस्थानच्या (Rajasthan) बांसवाडा जिल्ह्यात एक नव्या नवरीच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. महिलेने रक्षाबंधनाच्या तीन दिवसांनंतर आपल्या सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करणारी महिला तिच्या पतीपेक्षा तीन वर्षांनी मोठी होती. महिला बीए पास होती तर तिचा पती अजूनही 12 सायन्सचा विद्यार्थी आहे. महिला रक्षाबंधनासाठी माहेरी गेली होती. तीन दिवसांनी परत आल्यावर तिने आत्महत्या केली. सूनेचा मृतदेह लटकलेला पाहून सासरच्या लोकांना चांगला धक्का बसला.

पोलिसांनुसार, ही घटना बांसवाडा जिल्ह्याच्या भूंगडा भागातील आहे. पोलिसांनी सांगितलं की, 22 वर्षीय नीमाचं लग्न 5 महिन्यांआधी गणेशलाल चरपोटासोबत झालं होतं. लग्नानंतर दोघेही आनंदाने संसार करत होते. राखीच्या दिवशी दोघेही महिलेच्या माहेरी घाटोलला गेले होते. रक्षाबंधन करून पती-पत्नी दोघेही घरी परत आले.

महिलेच्या गावाहून परत आल्यावर पती गणेशलाल शेतात गेला होता. तेव्हाच महिला नीमाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना घटनेची सूचना शनिवारी रात्री 8 वाजता देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहोचून महिलेचा मृतदेह खाली काढला. त्यानंतर तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. 

प्राथमिक तपासातून समोर आलं की, घटनेवेळी महिलेचा पती शेतात गेला होता आणि सासू-सासरेही घरात नव्हते. सासरच्या लोकांनी सांगितलं की, महिलेने घराचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला. पण महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला. पोलिसांनी दोन्ही पक्षांचे जबाब घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आत्महत्येचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी