शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Atul Subhash : "आमच्या मुलाला मारलं, आता नातवाला तरी परत करा"; अतुल सुभाषच्या वडिलांचं निकिताला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:22 IST

Atul Subhash : एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या वडिलांना आता त्यांच्या नातवाची काळजी वाटू लागली आहे.

एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या वडिलांना आता त्यांच्या नातवाची काळजी वाटू लागली आहे. सून निकिता हिला गुरुग्राममधील मार्केटमधून अटक केल्यानंतर त्यांनी भावनिक आवाहन केलं आहे. माझ्या मुलाला मारलं, आता नातवाला तरी परत करा, असं सांगितलं. मुलगा आणि सुनेमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. घटस्फोट घेण्यासाठी सून निकिताने २० लाख रुपयांची मागणी केली होती असंही वडिलांनी म्हटलं आहे. 

२०२१ मध्ये ही रक्कम देण्याचंही त्यांनी मान्य केलं होतं, परंतु नंतर पुढे काही झालं नाही. त्यावेळी घटस्फोट झाला असता तर आज त्यांचा मुलगा जिवंत असता. दुसरीकडे, कर्नाटक पोलिसांनी दावा केला आहे की, निकिता अटक टाळण्यासाठी गुरुग्रामच्या सेक्टर-५७ येथील मार्केटमध्ये लपून बसली होती. सध्या कर्नाटक पोलिसांनी निकिता, त्याची आई, भाऊ आणि काका यांना अटक केल्यानंतर स्थानिक न्यायालयात हजर केलं.

कर्नाटक पोलिसांचं एक पथक अजूनही जौनपूर ते बनारसपर्यंत फिरत आहे. हे पोलीस पथक निकिताच्या बँक अकाऊंटपासून ते लग्नाच्या ठिकाणापर्यंत सर्व गोष्टींचा तपास करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत बरेच पुरावे मिळाले आहेत. एआय इंजिनिअर अतुल सुभाष याने ८० मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर आत्महत्या केली होती.

अतुल सुभाषचा मृतदेह बंगळुरू येथील मंजुनाथ लेआउट येथील फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. 'जस्टिस इज ड्यू' असंही लिहिलं होतं. आपल्या मृत्यूसाठी त्याने पत्नी, सासू, मेहुणा आणि सासरच्या काही लोकांना जबाबदार धरलं होतं. निकिताला अतुलकडून पैसेही घ्यायचे होते आणि केसही लढत राहायचं होतं.

नातू अजूनही निकिताच्या ताब्यात असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. मुलगा गेला आहे, आता फक्त नातू परत आला पाहिजे असं म्हटलं. बंगळुरूचे डीसीपी व्हाइट फील्ड डिव्हिजन शिवकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूला पोहोचल्यानंतर आरोपींची चौकशी केली जाईल. यावेळी अतुल सुभाषच्या आत्महत्येच्या व्हिडीओमध्ये करण्यात आलेले सर्व आरोप समोर येणार आहेत. या व्हिडिओमध्ये पत्नी आणि तिच्या कुटुंबाशिवाय अतुलने कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBengaluruबेंगळूरPoliceपोलिस