शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

एटीएसच्या कारवाईने भांडार आळी गावाची झोप उडवली 

By पूनम अपराज | Updated: August 10, 2018 17:39 IST

एटीएस रात्रभर कारवाईत अख्ख आळी होती जागी; गावकरी वैभव राऊतच्या पाठीशी

मुंबई - नालासोपाऱ्यातील भांडार आळी येथे काल रात्री ७.३० वाजल्यापासून दहशतवादविरोधी पथकाची (एटीएस) कारवाई सुरु होती. या कारवाईदरम्यान आज सकाळी वैभव राऊतला ताब्यात घेऊन एटीएसचे पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, रात्रभर चाललेल्या या कारवाईमुळे गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली. वैभवच्या पाठीशी संबंध गाव असल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. 

नालासोपाऱ्यातील भांडार आळी गावात लक्षद्वीप या दुमजली इमारतीत वैभव आपल्या दोन काकांच्या कुटुंबियांसोबत राहतो. पूर्वजांपासून वैभवचे आई - वडील याठिकाणी राहतात. भांडार आळी हे १ हजार लोकांचं गाव असून या गावात वैभवची इस्टेट एजंट म्हणून ओळख आहे. पूर्वी वैभवच्या वडिलांचा ट्रांस्पोटेशनचा व्यवसाय होता. तर दुसरे काका शिवसैनिक होते आणि ते सध्या हयात नाहीत अशी माहिती गावकरी हर्षद राऊत यांनी दिली. वैभव हा विवाहित असून त्यांना एक मुलगा तर एक मुलगी आहे. त्याचे वडील हयात नसून आईसोबत राहतो. अचानक काल रात्री ७, साडेसातच्या सुमारास काही पोलीस वैभवच्या राहत्या घरी धाड घालण्यास आले. त्यावेळी आम्हाला काहीच जाणीव नव्हती. मात्र, रात्री साडेआठच्या सुमारास पोलिसांची कुमक आली. तेव्हा आम्हाला काहीतरी संशयास्पद कारवाई होत असल्याचे कळाले. त्यानंतर आम्ही सर्व गावकरी रात्रभर जागे आहोत असे हर्षद यांनी सांगितले. साईदर्शन या चार मजली इमारतीत वैभवच्या एका दुकानाच्या गाळ्यात ८ गावठी बॉम्ब सापडले आणि आम्हाला धक्काच बसला. वैभव असे करेल असे अजिबात वाटत नाही आम्ही सर्व गावकरी त्याच्या सोबत आहोत असे हर्षदने पुढे सांगितले. 

तो कट्टर गोरक्षक आहे. उघड्यावर बकऱ्यांची कत्तल केली तर त्याला खपत नसे तो कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे धाव घेत असे. मात्र काही अतिरेकी कारवाया करेल असे वाटत नाही. एटीएसने कारवाई दरम्यान त्याच्या घरच्यांना किंवा कोणत्याही गावकऱ्याला विश्वासात घेतले नाही असा आरोप गावकरांनी केला आहे. एटीएसच्या कारवाईने मात्र भांडार आळी गावाची झोप उडवली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथक