शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

आशिष मिश्राचा जामीन रद्द; शरण येण्याचा आदेश; लखीमपूर हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 10:58 IST

मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या विशेष पीठाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने अप्रासंगिक मुद्दे विचारात घेतले आणि एफआयआरच्या आशयाला अतिरिक्त महत्त्व दिले.

नवी दिल्ली : लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अलाहाबाद हायकोर्टाने दिलेला जामीन सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. एक आठवड्याच्या आत त्याने शरण यावे असे निर्देश न्यायालयाने दिले. मुख्य न्यायाधीश एन. व्ही. रमणा आणि न्या. सूर्यकांत व न्या. हिमा कोहली यांच्या विशेष पीठाने स्पष्ट केले की, उच्च न्यायालयाने अप्रासंगिक मुद्दे विचारात घेतले आणि एफआयआरच्या आशयाला अतिरिक्त महत्त्व दिले. पीडितांची सुनावणी घेण्यास नकार देणे आणि उच्च न्यायालयाने दाखविलेली घाई ही कारणे जामीन आदेश रद्द करण्यास पुरेसी आहेत. आशिष मिश्राचा जामीन रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांकडून दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आपला आदेश ४ एप्रिल रोजी सुरक्षित ठेवला होता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १० फेब्रुवारी रोजी आशिष मिश्राला जामीन दिला होता. तो चार महिन्यापासून कोठडीत होता. जामीन देण्याच्या निर्णयावर सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, खटला सुरू होणे बाकी असताना पोस्टमार्टम रिपोर्ट, जखमांचे स्वरूप यासारख्या अनावश्यक मुद्द्यांचा विचार करायला नको होता. मागील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी लखीमपूर खिरी हिंसाचारात आठ लोकांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशचे तत्कालीन उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या या भागातील दौऱ्याला शेतकऱ्यांचा विरोध होता. याचवेळी हा हिंसाचार झाला. पोलिसांच्या एफआयआरनुसार, आशिष मिश्रा ज्या वाहनात बसले होते त्या वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडले होते. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाहन चालक आणि दोन भाजप कार्यकर्त्यांची कथितरीत्या मारहाण करून हत्या केली होती. या हिंसाचारात एका पत्रकाराचाही मृत्यू झाला होता.

पीडितांसोबत उभे राहणे आमची जबाबदारी : प्रियांका गांधी -     पीडित कुटुंबाच्या न्यायाच्या लढाईत शेवटपर्यंत त्यांच्यासोबत उभे राहणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.-     त्यांनी ट्विट केले की, लखीमपूर प्रकरणातील पीडित कुटुंब न्यायाची लढाई लढत आहेत. सत्तेच्या संरक्षणात त्यांच्यावर क्रूर प्रकारचा अन्याय झाला.-     हा संघर्ष कितीही दीर्घ पल्ल्याचा असला तरी त्यांच्यासोबत उभे राहणे ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. 

शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा : राकेश टिकैत -     आशिष मिश्राचा जामीन रद्द झाल्यानंतर बोलताना भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणाले की, न्यायालयाच्या या आदेशाने शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.-     उत्तर प्रदेश सरकारने आता पीडित शेतकऱ्यांची सुरक्षा, भरपाई आणि न्याय देण्यासाठी काम करावे.  

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारCourtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालय