शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

Arnab Goswami : अर्णब  गाेस्वामी यांनी जामीन अर्ज घेतला मागे     

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2020 15:12 IST

Arnab Goswami : मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी गाेस्वामी यांच्या वकीलांनी मुळात पाेलिसांनी दाखल केलेला एफआयआर चुकीचाच आहे, असा अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देअन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबागच्या न्यायालायाने बुधवारी अर्णव गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांची 14 दिवसांकरीता न्यायालयीन काेठडीत रवानगी केली हाेती. आठच्या सुमारास एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत त्यांना अलिबागला नेण्यात आले होते.

आविष्कार देसाई                                                                                                                                                                                                                                                   

रायगड  -  रिपब्लिक भारतचे संपादक अर्णव गाेस्वामी यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती वकील डाॅ. निहा राऊत यांनी लाेकमतशी बाेलताना दिली.अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबागच्या न्यायालायाने बुधवारी अर्णव गाेस्वामी यांची 14 दिवसांकरीता न्यायालयीन काेठडीत रवानगी केली हाेती. त्यानंतर तातडीने तिन्ही आराेपींनी जामिनासाठी अर्ज दाखल केला हाेता. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी गाेस्वामी यांच्या वकीलांनी मुळात पाेलिसांनी दाखल केलेला एफआयआर चुकीचाच आहे, असा अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर दुपारी तीन वाजता सुनावणी हाेणार आहे. याच कारणासाठी गाेस्वामी यांनी अलिबाग न्यायालयात दाखल केलेला जामिन अर्ज मागे घेतला आहे, असे वकील डाॅ. निहा राऊत यांनी स्पष्ट केले.

 

Arnab Goswami : अर्णब गोस्वामी यांनी बुधवारी रात्री अलिबागमध्ये कुठे मुक्काम केला?

 

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेने बुधवार सकाळपासून गोंधळाचे वातावरण निर्माण केले. पाेलिसांशी दीड तास हुज्जत घातल्यानंतर गोस्वामी यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून अलिबागला नेण्यात आले. या वेळी सरकार आणि पोलिसांवर टीका करत वाहनातूनही ‘पूछता है भारत’चा त्यांचा नारा सुरू होता.सकाळी पाच वाजता मुंबई गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रभारी सचिन वाझे यांच्या नेतृत्वात मुंबई पोलिसांचे पथक आणि रायगड पोलीस गोस्वामी यांच्या वरळी येथील घरी धडकले. सुरुवातीला बराच वेळ पोलिसांना दारातच ताटकळत ठेवण्यात आले. वकिलांशी बोलल्यानंतर गोस्वामी यांनी पथकाला आत येऊ दिले. पुढे पोलिसांनी रीतसर सर्व कागदपत्रे, यापूर्वी दिलेल्या नोटीस त्यांना दाखवून सोबत येण्यास सांगितले. मात्र गोस्वामी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे व्हिडीओ शूटिंग सुरू केले. या वेळी जवळपास दीड तास पाेलिसांशी हुज्जत घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना हात धरून बाहेर नेण्यास सुरुवात करताच, गोस्वामी यांनी तब्येत बरी नसल्याचे सांगितले. त्यातही टीव्हीवर लाइव्ह अपडेट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना घरातून बाहेर काढत पोलीस वाहनात बसविले. वाहनातूनही सरकार आणि पोलिसांवर त्यांचे टीका करणे सुरू होते. आठच्या सुमारास एन.एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात डायरी नोंद करत त्यांना अलिबागला नेण्यात आले होते.

 

अर्णब गाेस्वामी, नितेश सारडा आणि फिराेज शेख यांना मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी 14 दिवसांची न्यायालयीन काेठडी सुनावली हाेती. त्याला आव्हान देणारा अर्ज रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी सुनावणी हाेणार- जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालयalibaugअलिबाग