शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 01:20 IST

रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस त्यांना घेऊन गेले.

रायगड : वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबागच्या न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. गोस्वामी यांच्यासह अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनाही तळोजा कारागृहात नेण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस त्यांना घेऊन गेले. ज्या वाहनातून गोस्वामी यांना पोलीस घेऊन गेले होते, ती गाडी पूर्णपणे सगळ्या बाजूने झाकण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर गोस्वामी आणि त्यांच्यासोबतच्या अन्य दोघांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. ४ दिवस तेथे ठेवल्यानंतर गोस्वामी यांना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले.

अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण हाय प्रोफाइल प्रकरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती कारागृह प्रशासनाने जिल्हा सत्र न्यायालयाला केली होती. कारागृह महानिरीक्षक यांच्याशी बोलून निर्णय घेण्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार, निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिस