शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 01:20 IST

रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस त्यांना घेऊन गेले.

रायगड : वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अलिबागच्या न्यायालयीन कोठडीत असलेले रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलविण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. गोस्वामी यांच्यासह अन्य आरोपी फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनाही तळोजा कारागृहात नेण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस त्यांना घेऊन गेले. ज्या वाहनातून गोस्वामी यांना पोलीस घेऊन गेले होते, ती गाडी पूर्णपणे सगळ्या बाजूने झाकण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर गोस्वामी आणि त्यांच्यासोबतच्या अन्य दोघांना अलिबाग येथील मराठी शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले होते. ४ दिवस तेथे ठेवल्यानंतर गोस्वामी यांना आज तळोजा कारागृहात हलविण्यात आले.

अर्णब गोस्वामी यांचे प्रकरण हाय प्रोफाइल प्रकरण आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजा कारागृहात हलवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती कारागृह प्रशासनाने जिल्हा सत्र न्यायालयाला केली होती. कारागृह महानिरीक्षक यांच्याशी बोलून निर्णय घेण्याचे न्यायालयाने सांगितले होते. त्यानुसार, निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीPoliceपोलिस