शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Arnab Goswami : मराठी-इंग्रजीवरून आरोपींच्या वकिलांचा टाईमपास सुरुय!; विशेष सरकारी वकिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 18:48 IST

Arnab Goswami : विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु आहे, यावर अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

ठळक मुद्दे या अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला.विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु आहे, यावर अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

आविष्कार देसाई 

रायगड :  अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. याप्रकरणी आता 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगडपोलिसांनी रायगडच्या  जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

रायगड पोलिसांनीसत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर सुनावणी सुरू आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी सुरु आहे. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली. आरोपी क्र. 3 नितेश सारडा यांच्या वकीलांनी सरकारपक्षातर्फे दिलेला पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज तसेच रिमांडबाबत करण्यात आलेला आदेश मराठीत असल्याने, तो इंग्रजीमध्ये भाषांतरीत करुन मिळण्याकरिता मे. न्यायालयात अर्ज केला. सारडा हे पश्‍चिम बंगालचे राहणारे आहे. तसेच मारवाडी आहेत. त्यांना मराठी कळत नाही, त्यामुळे अर्ज इंग्रजीमध्ये देण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला.

या अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. या न्यायालयाची भाषा मराठी आहे. आरोपीचे वकील हे देखील महाराष्ट्रातील असून त्यांची भाषाही मराठी आहे. तसेच रिमांडचे कामी पोलिसांनी दिलेले रिपोर्ट मराठीत असतात. तसेच रिमांडचे कामी नितेश सारडाच्या वकीलांनी रिमांड रिपोर्ट मराठीत असतानाही युक्तिवाद मराठीत केला. तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे केवळ पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज इंग्रजीमध्ये भाषांतरित करुन मिळण्याची सारडा याच्या वकीलांची मागणी फेटाळण्याची विनंती अ‍ॅड.घरत यांनी केली. युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी नितेश सारडा यांच्या वकीलांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या वकीलांनी पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्जावरील आजची सुनावणी स्थगित करुन सुनावणीकरिता पुढील मुदत मिळणेचा अर्ज केला. त्यावर युक्तिवाद करताना तिघांच्याही वकीलांनी उच्च न्यायालयात दाखल याचिका प्रलंबित असल्याने आजची होणारी सुनावणी स्थगित करण्याची विनंती केली.

मात्र सुनावणी स्थगित करणेच्या अर्जांना विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी जोरदार हरकत घेतली. उच्च न्यायालयात दाखल याचिकेतील मुद्दे आणि सत्र न्यायालयात ज्या कारणासाठी अर्ज दाखल केला आहे ते मुद्दे वेगळे आहेत. केवळ आरोपींना पोलीस कोठडी होऊ नये, याकरिता आरोपींचे वकील वेळ काढत असल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीकरिता 9 नोव्हेंबर ही तारीख दिली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु आहे, यावर अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीSessions Courtसत्र न्यायालयalibaugअलिबागRaigadरायगडPoliceपोलिस