शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

Arnab Goswami : मराठी-इंग्रजीवरून आरोपींच्या वकिलांचा टाईमपास सुरुय!; विशेष सरकारी वकिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2020 18:48 IST

Arnab Goswami : विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु आहे, यावर अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

ठळक मुद्दे या अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला.विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु आहे, यावर अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

आविष्कार देसाई 

रायगड :  अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना आणखी दोन दिवस कोठडीत काढावे लागणार आहेत. याप्रकरणी आता 9 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. गोस्वामी यांच्या न्यायालयीन कोठडीच्या आदेशाला रायगडपोलिसांनी रायगडच्या  जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

रायगड पोलिसांनीसत्र न्यायालयात दाखल केलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर सुनावणी सुरू आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.जी. मलशेट्टी यांच्या न्यायालयासमोर ही सुनावणी सुरु आहे. सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास न्यायाधीश कोर्टात दाखल झाले आणि सुनावणीला सुरुवात झाली. आरोपी क्र. 3 नितेश सारडा यांच्या वकीलांनी सरकारपक्षातर्फे दिलेला पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज तसेच रिमांडबाबत करण्यात आलेला आदेश मराठीत असल्याने, तो इंग्रजीमध्ये भाषांतरीत करुन मिळण्याकरिता मे. न्यायालयात अर्ज केला. सारडा हे पश्‍चिम बंगालचे राहणारे आहे. तसेच मारवाडी आहेत. त्यांना मराठी कळत नाही, त्यामुळे अर्ज इंग्रजीमध्ये देण्यात यावा, असा युक्तिवाद त्यांनी केला.

या अर्जावर सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. या न्यायालयाची भाषा मराठी आहे. आरोपीचे वकील हे देखील महाराष्ट्रातील असून त्यांची भाषाही मराठी आहे. तसेच रिमांडचे कामी पोलिसांनी दिलेले रिपोर्ट मराठीत असतात. तसेच रिमांडचे कामी नितेश सारडाच्या वकीलांनी रिमांड रिपोर्ट मराठीत असतानाही युक्तिवाद मराठीत केला. तेव्हा त्यांनी आक्षेप घेतला नाही. त्यामुळे केवळ पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्ज इंग्रजीमध्ये भाषांतरित करुन मिळण्याची सारडा याच्या वकीलांची मागणी फेटाळण्याची विनंती अ‍ॅड.घरत यांनी केली. युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी नितेश सारडा यांच्या वकीलांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सारडा यांच्या वकीलांनी पुनर्निरीक्षण अर्ज आणि स्थगिती अर्जावरील आजची सुनावणी स्थगित करुन सुनावणीकरिता पुढील मुदत मिळणेचा अर्ज केला. त्यावर युक्तिवाद करताना तिघांच्याही वकीलांनी उच्च न्यायालयात दाखल याचिका प्रलंबित असल्याने आजची होणारी सुनावणी स्थगित करण्याची विनंती केली.

मात्र सुनावणी स्थगित करणेच्या अर्जांना विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी जोरदार हरकत घेतली. उच्च न्यायालयात दाखल याचिकेतील मुद्दे आणि सत्र न्यायालयात ज्या कारणासाठी अर्ज दाखल केला आहे ते मुद्दे वेगळे आहेत. केवळ आरोपींना पोलीस कोठडी होऊ नये, याकरिता आरोपींचे वकील वेळ काढत असल्याचे त्यांनी युक्तिवादात म्हटले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीकरिता 9 नोव्हेंबर ही तारीख दिली. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सुरु आहे, यावर अर्णव गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सारडा यांचे वकील 9 नोव्हेंबरला युक्तिवाद करतील.

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीSessions Courtसत्र न्यायालयalibaugअलिबागRaigadरायगडPoliceपोलिस