शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Arnab Goswami : अर्णब यांची बाजू मांडताना हरीश साळवे यांनी ठाकरे सरकारवर केले आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2020 21:39 IST

Arnab Goswami : अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद मांडला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले की, अर्णब यांना राज्य सरकार हेतुपुरस्कार आणि जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे.           

ठळक मुद्देपरवाची अटक ही त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. दंडाधिकारी न्यायालयाचा किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाची परवानगी नसताना पोलिसांनी हेतूपुरस्कार, जाणीवपूर्वक पुन्हा तपास सुरू करून गोस्वामी यांना बेकायदेशीर पद्धतीने अटक केली आहे, असा ज्येष्ठ वकील साळवे यांनी युक्

अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे युक्तिवाद मांडला. त्यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले की, अर्णब यांना राज्य सरकार हेतुपुरस्कार आणि जाणीवपूर्वक टार्गेट करत आहे.    

      

मुंबई पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांना या याचिकेत वैयक्तिकरीत्या प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे त्याबद्दल त्यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील अॅड. देवदत्त कामत यांनी तीव्र आक्षेप घेतला. हे संपूर्ण प्रकरण रायगड पोलिसांशी संबंधित आहे, असे असताना मला वैयक्तिक स्वरुपात प्रतिवादी करण्यात आले आहे. हे चुकीचे आहे. त्यामुळे माझे नाव वगळण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना द्यावेत अशी विनंती कामत यांनी उच्च न्यायालयाला केली आहे.  अर्णव गोस्वामी यांना कशाही प्रकारे अडकवायचेच, असा उद्देश ठेवून राज्य सरकारकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. परवाची अटक ही त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. दंडाधिकारी न्यायालयाचा किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाची परवानगी नसताना पोलिसांनी हेतूपुरस्कार, जाणीवपूर्वक पुन्हा तपास सुरू करून गोस्वामी यांना बेकायदेशीर पद्धतीने अटक केली आहे, असा ज्येष्ठ वकील साळवे यांनी युक्तिवाद यांनी केला. 

 

विधानसभा हक्कभंग प्रस्तावाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आजच अर्णव गोस्वामी यांच्या अटकेला स्थगिती देऊन विधानसभा सचिवांना कंटेम्प्टविषयी नोटीस बजावली आहे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय हायकोर्टाला की, गोस्वामी यांना लक्ष्य करण्याचा राज्य सरकारकडून वारंवार प्रयत्न होत आहे. वाईट हेतूने आणि जाणीवपूर्वक गोस्वामी यांच्याविरोधात सर्व काही सुरू आहे’ असे गोस्वामींतर्फे ज्येष्ठ वकील अॅड. हरिश साळवे यांनी मुंबई हायकोर्टात आरोप केले.अॅड. हरिश साळवे यांच्यासाठी एका ज्युनिअर वकिलाने अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी सुनयना पिंगळे यांनी ४ नोव्हेंबर रोजी न्यायालयीन कोठडीविषयी दिलेल्या आदेशाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर वाचन केले गेले. ‘आधीचा ए-समरी अहवाल अस्तित्वात असताना आणि त्याला आव्हान देण्यात आलेले नसताना आणि पुन्हा तपास सुरू करण्यासंदर्भात न्यायालयाचा आदेश मिळवला नसताना पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केल्याचे दिसत आहे. आरोपींकडून कोणत्याही गोष्टी हस्तगत केलेल्या नाही. जी काही कागदपत्रे ही फिर्यादींकडून मिळवलेली आहेत. मे-२०१८मधील आत्महत्यांच्या घटनांसंदर्भात आरोपींशी संबंध प्रस्थापित होत असल्याचे पोलिसांनी दाखवलेले नाही. पूर्वी झालेला तपास कसा अपूर्ण आहे? त्यात काय त्रुटी आहेत? हेही सरकारी पक्षाने दाखवलेले नाही. त्यामुळे आरोपींची पोलीस कोठडी द्यावी, या सरकारी पक्षाच्या विनंतीचे समर्थन होऊ शकत नाही‘, असे न्यायदंडाधिकाऱ्यांनी ४ नोव्हेंबर रोजी पोलीस कोठडीची विनंती फेटाळताना आदेशात नमूद केल्याचे अॅड. हरिश साळवे यांनी निदर्शनास आणले.

 

‘विधानसभेत अर्णब गोस्वामी यांचे वार्तांकन कसे सुरू आहे आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करून कसा अवमान करत आहेत इत्यादीविषयी विधानसभेत चर्चा झाली. त्यावेळी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येचे प्रकरण हे पुन्हा तपासासाठी दिले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात केली. त्यापूर्वी पालघर झुंडबळी प्रकरणाच्या निमित्ताने केलेल्या वार्तांकनाविषयी गोस्वामींच्या विरोधात अनेक एफआयआर करण्यात आले. त्यानंतर टीआरपी घोटाळ्याप्रकरणी एफआयआरमध्ये नाव नसतानाही रिपब्लिक टीव्हीचे नाव मुंबई पोलिसांनी घेतले. त्यालाही आम्ही रिट याचिकेद्वारे हायकोर्टात आव्हान दिले आहे आणि आता नाईक प्रकरणात गोस्वामींना लक्ष्य केले जात आहे.’’, असा युक्तिवाद साळवे यांनी केला. तसेच उद्या दुपारी १२ वाजता मुंबई हायकोर्टाने पुन्हा सुनावणी ठेवली आहे त्यावेळी गोस्वामींना सुटकेचा अंतरिम दिलासा देण्याच्या विनंतीविषयी विचार करण्याचे संकेत दिले असून  उद्या केवळ अंतरिम दिलासाविषयी सुनावणी घेऊ, असेही स्पष्टपणे खंडपीठाने सांगितले. 

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीHigh Courtउच्च न्यायालयPoliceपोलिसParam Bir Singhपरम बीर सिंगMumbaiमुंबई