शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:55 IST

Crime UP : पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, एका पित्याने आपल्या दोन लहान मुलांना गंगेत फेकले आणि नंतर स्वतःही नदीत उडी मारली. पत्नीसोबत झालेल्या वादानंतर नैराश्यातून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

ही घटना वाराणसी जिल्ह्यातील रिंग रोडवरील बभनपुरा पुलावर घडली. चांदपूर येथील रहिवासी असलेल्या दुर्गा सोनकर यांचा त्यांच्या पत्नीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादानंतर संतापलेल्या आणि नैराश्यात गेलेल्या दुर्गाने आपला सात वर्षांचा मुलगा संदीप आणि पाच वर्षांचा मुलगा आशिष यांना घेऊन घर सोडले.

बभनपुरा पुलावर पोहोचल्यावर त्याने आधी दोन्ही मुलांना गंगेत फेकले आणि नंतर स्वतःही नदीत उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले.

पिता बचावला, मुलांचा शोध सुरू

दुर्गा सोनकर यांना मुस्तफाबाद गावाजवळ काही गावकऱ्यांनी पाण्याबाहेर काढले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, दोन्ही मुलांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. एनडीआरएफच्या (NDRF) टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलांचा शोध सुरू केला, परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. यामुळे, अंधारामुळे शोधमोहीम थांबवण्यात आली.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश